टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील श्री.समर्थ डेअरीमधून श्रीखंड, बासुंदी, रबडी, पनीर हे पदार्थ मरवडे येथील चव्हाण कुटुंबातील सदस्यांनी खाल्ल्याने त्यांना उलटी, जुलाब यांचा त्रास होवून
उपचारादरम्यान यातील नम्रता चव्हाण, भक्ती चव्हाण या दोघींचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल होवून पोलिस कोठडीत असलेले
आरोपी डेअरी चालक संतोष लहू कोंडुभैरी, आकाश धोंडीराम फुगारे दोघांची मंगळवेढ्याचे न्यायाधीश आरव्ही.नडगदल्ली यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नाशिक जिल्हयातून
त्या दोघांना ताब्यात घेवून अटक केली व त्यांना मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.
या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. त्यावेळी सरकार पक्षातर्फे पुन्हा पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी आरोपींचे वकील अॅड.धनंजय हजारे व अॅड.डी.एस.माने यांनी आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याबाबतचा युक्तीवाद केला असता न्यायालयाने सरकारपक्षाची मागणी फेटाळून लावली व आरोपींना १५ दिवसांची न्यायालयीन कोडठी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज