Mangalwedha Times:-
समाजमंदिराची दुरूस्तीची करावी हिच खरी आदरांजली असेल अशी मागणी केली.
उमाजी नाईक ३ फेब्रुवारी हा स्मृतिदिन आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एक आद्यक्रांतिकारक होते.
इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे ‘उमाजी नाईक’.३ फेब्रुवारीहा या आद्यक्रांतिकाराचा स्मृतिदिन. रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे, उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.
इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, “उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी महाराज सारखे राज्य स्थापणार नाही?”
तर टॉस म्हणतो, “उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा छत्रपती शिवाजी महाराज झाला असता.” हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे . जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हातच स्वातंत्र्यय लाभले असते.
मंगळवेढा येथील बेरड गल्लीतील उमाजी नाईक समाजमंदिराची अवस्था दयनीय झाली आहे. तरी त्या ठिकाणी त्वरित समाजमंदिरात लादिकरण, कलर काम,पेवर ब्लाॅक, दिवाबत्तीची सोय व दुरूस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्तानी यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज