मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात बाहेर फिरण्यास मनाई असताना रस्त्यावर मोकाट फिरणार्या 212 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या.तर विना मास्क फिरणार्या 66 नागरिकांना पोलिसांनी 12 तास पोलिस ठाण्यात बसण्याची त्यांना शिक्षा दिली.
दरम्यान शासनाने लॉकडाऊन जाहिर करूनही लोक रस्त्यावर विनाकारण येत असल्याने पोलिस प्रशासन वेगवेगळे प्रयोग करून लोकांना अटकाव करण्याचा प्रयत्न करीत असून यापुढे रस्त्यावर येणार्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याने नागरिकांनी आपल्या घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोरोना संसर्गजन्य आजार दिवसेंदिवस वाढत असल्याने ती चिंतेची बाब बनली आहे.याला रोखण्यासाठी घरात बसणे हा एकमेव पर्याय असल्याने शासनाने खबरदारी घेत नागरिकांना दि 30 एप्रिलपर्यंत घरात बसण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान काही नागरिक विनाकारण मोटर सायकलवर व पायी शहरात फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत असल्याने पोलिसंानी कलम 68 प्रमाणे त्यांना पकडून दिवसभर पोलिस ठाण्यात बसण्याची शिक्षा देत आहेत.संध्याकाळी कलम 69 प्रमाणे त्यांची मुक्तता करण्यात आली. यामध्ये 66 लोकांचा समावेश होता.
गेल्या दोन दिवसात मंगळवेढा शहरात मोकाट फिरणार्या 212 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या.या मोटर सायकली 30 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपल्यानंतरच सदर मोटर सायकलची लायसन्स,इन्शूरन्स व गाडीची कागदपत्रे तपासूनच गाडी ताब्यात दिली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे,वाहतूक शाखेचे बंडोपंत कुंभार,सागर लांडे,नागनाथ डबरे आदी करीत आहेत.
—————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात बाहेर फिरण्यास मनाई असताना रस्त्यावर मोकाट फिरणार्या 212 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या.तर विना मास्क फिरणार्या 66 नागरिकांना पोलिसांनी 12 तास पोलिस ठाण्यात बसण्याची त्यांना शिक्षा दिली.
दरम्यान शासनाने लॉकडाऊन जाहिर करूनही लोक रस्त्यावर विनाकारण येत असल्याने पोलिस प्रशासन वेगवेगळे प्रयोग करून लोकांना अटकाव करण्याचा प्रयत्न करीत असून यापुढे रस्त्यावर येणार्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याने नागरिकांनी आपल्या घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोरोना संसर्गजन्य आजार दिवसेंदिवस वाढत असल्याने ती चिंतेची बाब बनली आहे.याला रोखण्यासाठी घरात बसणे हा एकमेव पर्याय असल्याने शासनाने खबरदारी घेत नागरिकांना दि 30 एप्रिलपर्यंत घरात बसण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान काही नागरिक विनाकारण मोटर सायकलवर व पायी शहरात फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत असल्याने पोलिसंानी कलम 68 प्रमाणे त्यांना पकडून दिवसभर पोलिस ठाण्यात बसण्याची शिक्षा देत आहेत.संध्याकाळी कलम 69 प्रमाणे त्यांची मुक्तता करण्यात आली. यामध्ये 66 लोकांचा समावेश होता.
गेल्या दोन दिवसात मंगळवेढा शहरात मोकाट फिरणार्या 212 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या.या मोटर सायकली 30 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपल्यानंतरच सदर मोटर सायकलची लायसन्स,इन्शूरन्स व गाडीची कागदपत्रे तपासूनच गाडी ताब्यात दिली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे,वाहतूक शाखेचे बंडोपंत कुंभार,सागर लांडे,नागनाथ डबरे आदी करीत आहेत.
—————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज