टीम मंगळवेढा टाईम्स ।
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुण्यात धडाडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात राज ठाकरेंची ही सभा पार पडली.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमणा मारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फक्त सांगावं त्यांच्यावर एक तरी केस आंदोलनाची आहे का, असा सवाल करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
तसंच राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला धारेवर धरले. मुंबईच्या सभेत तर ते औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय, असेही बोलले.
पण उद्धव ठाकरे आहेत तरी कोण? तुम्ही महात्मा गांधी किंवा वल्लभभाई पटेल आहात का?, असा शब्दांत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकतरी आंदोलन केल्याची केस आहे का? मराठीचा प्रश्न असो, हिंदुत्वाचा प्रश्न असो एक तरी केस आहे का?, परवा संभाजीनगरच्या नामांतरावरुन राज ठाकरेंनी तुम्ही सरदार पटेल की महात्मा गांधी आहे.
मी बोलतोय ला काय लॉजिक आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. पुढे राज ठाकरे म्हणाले की, केंद्रात सत्ता होती नामांतराचा प्रश्न मिटवला का, असा सवाल उपस्थित केला. तसंच संभाजीनगरचं भाषांतर झालं तर कशा वर बोलायचं, असा सवाल ही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
संभाजीनगर, जालना आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी येत नसल्यचं ते म्हणालेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती करतो की, त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा, असे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय.
राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला मारला आहे. निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
पुण्यातल्या अनेक मैदानांनी सभांना नकार दिला. आता आम्हाला मैदान नाही, तर कुणालाच द्यायचं नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
सध्याचे पावसाळी हवामान पाहता पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं?, अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला मारला आहे.
तसंच पावसाच्या शक्यतेमुळे हॉलमध्ये सभा घेत असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या सभेला पोलिसांनी अटी, शर्थींवर परवानगी दिली होती. धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये सभेत करू नयेत, आदी विविध अटी पोलिसांनी घातल्या होत्या.
मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज ही सभा पार पडली. या सभेसाठी गणेश कला क्रीडा मंच येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करा; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
सभेला सुरवात होताच राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले कि, आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असं ठाकरे म्हणाले.
तसेच पुढे ते म्हणाले कि, नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह आहे. मी म्हटलं निवडणुका नाहीत, उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज