उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह भीमा खोऱ्यातील पावसाचा वेग मंदावल्याने यातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग शुक्रवारी दुपारी दोन वाजता कमी करून तो 20 हजार क्युसेक करण्यात आला आहे.
दरम्यान आताच्या ताज्या माहितीनुसार नृसिंहपूर संगम येथे भीमा 2 लाख 28 हजार तर पंढरपूरमध्ये 2 लाख 91 हजार क्युसेकने वाहत आहे. नृसिंहपूरचा विसर्ग पाहता नदीची पाणीपातळी कमी होत असल्याचे चित्र आहे.
आज शुक्रवारी सकाळी उजनीच विसर्ग 80 हजार क्युसेक करण्यात आला होता. तो आता दुपारी 1 वाजता 40 हजार क्युसेकवर आणण्यात आला तर दोन वाजता तो 20 हजार क्युसेक करण्यात आला. वीरमधून 4 हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
उजनीत येणारा दौंडचा विसर्ग आता कमी होत आहे.दरम्यान भीमा खोऱ्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.सकाळी घोड , खडकवासला धरणातून पाणी सोडले जात होते.
दरम्यान आता उजनीचा विसर्ग कमी केल्याने भीमा नदीची पाणी पातळी कमी होण्यास आणखी मदत मिळणार आहे. पंढरपूरमध्ये भीमा नदी दुपारी बारा वाजता 2 लाख 91 हजार क्युसेकने वाहत होती.
नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पंढरपूर शहरातही मोठ्या प्रमाणात या पुराचा फटका असला आहे. जवळपास दहा हजार लोकांचे स्थलांतर प्रशासनाने केले आहे.
पंढरपूर शहरातील पाण्यामुळे बाधित झालेले भाग : घोंगडी गल्ली ( नाथ चौक 2 फूट पाणी कमी ) , प्रदक्षिणा मार्ग माढेश्वरी धर्मशाळा , परिचारक वाडा परिसर , कालिका देवी चौक , छत्रपती संभाजी महाराज चौक , काळा मारुती चौक इंदिरा गांधी भाजी मंडई ,
तर संत पेठ , सांगोला रोड वरील केंद्रे महाराज मठ , शनिश्वर महाराज मठ यासह डॉ.आंबेडकर नगर , व्यासनारायण , अंबाबाई पटांगण , लखुबाई मंदिर परिसर यांचा यात समावेश आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज