टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथील एका शेतकऱ्याने भिमा नदी काठावर शेतीच्या पाण्यासाठी बसवलेली विदयुत मोटर व केबल असा १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी अक्षय विठ्ठल पुजारी यांची तामदर्डी शिवारात शेती असून भिमा नदीच्या पात्रातून शेती पिकास पाणी देण्यासाठी पाईपलाईन केली आहे.
नदीकाठावर टेक्समो कंपनीची ५ एच पी ची मोटर व सदर मोटारीस १०० फुट केबल जोडून पिकासाठी फिर्यादी पाणी उपसा करीत आहेत. उजनी धरणातून पाणी भिमेच्या पात्रात सोडल्यामुळे फिर्यादी हे सकाळी ११.०० वा . पाणी बुडी मोटर नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यांना तेथे १०० फुट केबल वायर अज्ञात चोरटयानी घेवून गेल्याचे दिसून आले.
तसेच नदीपात्रातील पाणीबुडी मोटर पाहिली असता ती नदीपात्रात दिसून आली नाही. सदर घटनेनंतर फिर्यादीने परिसरात पाणबुडी मोटरचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.
७ हजार रुपये किमतीची हिरवट रंगाची पाणबुडी मोटर व ५ हजार रुपये किमतीचे एल टी एल के कंपनीचे काळे रंगाची वायर असा एकूण १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलिस नाईक हणमंत दुधाळ हे करीत आहेत.
दरम्यान, भिमा नदीकाठावर कृषी पंपाच्या केबल , स्टार्टर , ॲटो स्विच आदी चोरून नेण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
शेतकरी संध्याकाळी घरी आल्यानंतर शेतावर ते सकाळी जातात त्यामुळे चोरटे रात्रीच्यावेळी आपला डाव साधून घेत आहेत.
आत्तापर्यंत चोरी गेलेल्या केबल व इतर साहित्य पोलिसांना न सापडल्यामुळे चोरटयांचे मनोबल वाढून या प्रमाणात वाढ होत असल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.
पोलिसांनी सतर्कता बाळगून अशा घटनांचा तात्काळ शोध घेवून भुरटया चोरटयांना जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज