टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हळूहळू उठवण्यास सुरुवात केली. मात्र पुन्हा लॉकडाऊन होणार अशा अफवा पसरल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आता मोठा खुलासा केला आहे. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. (There are rumors that there will be a lockdown again Chief minister uddhav thakare)
करोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर ठिकठिकाणी गर्दी उसळत असल्याने राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करणार ही केवळ अफवा असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.गेल्या दोन- तीन दिवसांपासून सोशल मीडियावर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.यामुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर ठाकरे यांनी खुलासा केला आहे.
लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 12, 2020
लॉकडाऊनचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणार्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे, असे ठाकरे म्हणाले.आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत.
आपले व्यवहार हळूहळू सुरू करीत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही.
बाहेर पडल्यावर कायम चेहर्याला मास्क लावणे, साबणाने, जंतुनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल; पण ही जीवनपद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज