मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । काठीने प्रसाद दिला,दंडात्मक कारवाई केली तरीदेखील रिकामटेकडे लोक विनाकारण गाडीवर फिरतच आहेत. असे लोक जर आता शहरात गाडीवर फिरताना सापडले तर त्यांची गाडी जप्त करण्यात येईल व गाडीबाबतचा निर्णय हा १४ एप्रिलनंतरच घेण्यात येईल असा इशारा मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी दिला आहे.
गुंजवटे म्हणाले, संचारबंदी लागू झाल्यानंतरही लोक विनाकारण घराबाहेर येत आहेत.मंगळवेढा शहरात कोणतेही काम असले तरी त्यांना आता दुचाकीवर फिरता येणार नाही. शहरातील लोक जर कोठेही शहरात फिरताना मिळून आले तर आता कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून अशा लोकांना अद्दल घडविण्यासाठीच त्यांची गाडी जप्त करून ती पोलिस स्टेशनच्या आवारात लावण्यात येत आहे.
व १४ एप्रिलपर्यंत ती सुटू शकणार नाही. तसेच कोर्टातूनच ही गाडी संबंधितांना सोडवून घ्यावी लागेल याचा गांभिर्याने विचार करावा असे गुंजवटे यांनी सांगितले.
————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7588214814 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । काठीने प्रसाद दिला,दंडात्मक कारवाई केली तरीदेखील रिकामटेकडे लोक विनाकारण गाडीवर फिरतच आहेत. असे लोक जर आता शहरात गाडीवर फिरताना सापडले तर त्यांची गाडी जप्त करण्यात येईल व गाडीबाबतचा निर्णय हा १४ एप्रिलनंतरच घेण्यात येईल असा इशारा मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी दिला आहे.
गुंजवटे म्हणाले, संचारबंदी लागू झाल्यानंतरही लोक विनाकारण घराबाहेर येत आहेत.मंगळवेढा शहरात कोणतेही काम असले तरी त्यांना आता दुचाकीवर फिरता येणार नाही. शहरातील लोक जर कोठेही शहरात फिरताना मिळून आले तर आता कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून अशा लोकांना अद्दल घडविण्यासाठीच त्यांची गाडी जप्त करून ती पोलिस स्टेशनच्या आवारात लावण्यात येत आहे.
व १४ एप्रिलपर्यंत ती सुटू शकणार नाही. तसेच कोर्टातूनच ही गाडी संबंधितांना सोडवून घ्यावी लागेल याचा गांभिर्याने विचार करावा असे गुंजवटे यांनी सांगितले.
————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7588214814 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज