टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसोबतच सरपंचाची निवडी झाल्या आहेत. आता उपसरपंचपदाची निवडणुकीवरुन राजकारण रंगलं आहे. नवनियुक्ती सदस्यांतून उपसरपंचाची निवड केली जाणार आहे.
या निवडीवरुन अनेक ठिकाणी गंमती-जमती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनतेतून थेट सरपंच निवडल्यानंतर आता उपसरपंच निवडीवरुन गावात बैठका सुरु झाल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात १५ सरपंच व ३२९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १७४ सरपंच व १४ १८ सदस्य निवडीसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीतनंतर १५ दिवसात उपसरपंचाची निवड करावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी संबधीत ग्रामपंचायतींना पाठवले आहे
उपसरपंच निवडीसाठी आरक्षण नसून पॅनल प्रमुख किंवा सदस्य या पदासाठी दावा करु शकतात.त्यामुळे अनेक सदस्यांनी पॅनल प्रमुखांकडे उपसरपदासाठी फिल्डिग लावली आहे.
जनतेतून उपसरपंच निवड झाल्याने आता उपसरपंचपदालाही महत्व आहे आहे. सरपंच एका गटाचा, तर सदस्य हे दुसऱ्या गटाचे असा पेच अनेक ठिकाणी आहे.
उपसरपंच निवड प्रक्रियेत समान मते पडली तर अशी दोन मते देण्याचा अधिकार सरपंचांना दिला होता, हा अधिकार उच्च न्यायालयाने केवळ एक मतासाठी दिला आहे.
उपसरपंच निवडणुकीत समान मते पडल्यास मतदान घेण्यासाठी परवानगी आहे. यात सरपंचाला एक मत देण्याचा अधिकार आहे. आजपासून ते ९ जानेवारी दरम्यान ही निवडणुक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदारांनी कार्यक्रम जाहीर केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज