मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला झालाय. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. हा निकाल उद्या येणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी केली आहे.
घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाच्या निकाल लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी दिली आहे. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या वर्षी 30 जून रोजी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
तत्पूर्वी सूरत ते गुवाहाटी आणि तेथून गोवामार्गे महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर संपूर्ण भारतात आजही चर्चेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल यांची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.
न्यायालयाने आणि विधिमंडळाने कधी आपली पायरी किंवा लक्ष्मण रेषा ओलांडली नाही. सर्वोच्च न्यायालय या सगळ्या प्रकरणाचा एकत्रित निकाल देताना कुठल्या गोष्टींना प्राधान्य देता हे बघावे लागेल, असंही निकम यांनी म्हंटलं.
न्यायालयाचे भाष्य काय राहणार?
विद्यमान अध्यक्षाने तशी अपेक्षा ठेवणे अपेक्षित आहे. कारण दहाव्या परिशिष्टानुसार त्यांच्याकडे हा निर्णय आहे. पण विधिमंडळाच्या अध्यक्षांचीच निवड सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज आहे. त्यांची निवड ही अंडर चॅलेंज असताना सर्वोच्च न्यायालय त्यावर काय भाष्य करतो हे पाहावे लागेल, असंही निकम म्हणाले.
ज्यांनी या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस काढली त्या 16 आमदारांच्या अविश्वासाचा प्रस्ताव उपाध्यक्षांच्या विरोधात दाखल केला होता. म्हणजे हे सगळे प्रश्न एकमेकांशी गुंतलेले आहेत.
न्यायालयामध्ये दोनपेक्षा जास्त न्यायाधीश असतात त्यावेळी मतभिन्नता असते. त्यामुळे कशारितीने कुठल्या प्रश्नाला अग्रक्रम द्यायचा ते ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, असंही निकम यांनी सांगितलं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज