टीम मंगळवेढा टाईम्स ।
अल्प प्रतिसाद मिळालेल्या चार वाळू घाटांचा फेरलिलाव पूर्ण झाला असून यासाठी एकूण २७ जणांनी लिलावात भाग घेतल्याची माहिती आहे.
चार लिलाव अंतिम झाले असून यातून जिल्हा प्रशासनाला २८ कोटी ९ लाखांचा महसूल मिळणार आहे. पुढील ४८ तासांत २५ टक्के भरण्याची रक्कम सूचना प्रशासनाकडून संबंधितांना करण्यात आली आहे.
नवीन वाळू धोरणानुसार लिलाव झाला असून अपसेट प्राइस ६५० रुपये इतका होता. प्रत्येकी १५ हजार ब्राससाठी लिलाव झाला आहे.
पहिल्या ४८ तासांत २५ टक्के रक्कम भरणे बंधनकारक असून त्यानंतर ३० दिवसांत उर्वरित ७५ टक्के रक्कम ठेकेदारांना भरता येणार आहे.
मोहोळ-मंगळवेढा तालुक्यातील मिरी-तांडोर घाट क्रमांक एकचा लिलाव श्री.मंगलमूर्ती क्रशरने १२ कोटी ३४ लाख रुपयांना घेतलेला आहे.
घाट क्रमांक दोनचा लिलाव शिक्षिंदा लाइफस्टाइलने ७ कोटी ९ २ लाख रुपयांना घेतलेला आहे.
घोडेश्वरी तामदर्डी साठ क्रमांक एकचा लिलाव चौधरी पॉवर प्रोजेक्स्टने 3 कोटी ५३ लाख रुपयांना घेतलेला आहे.
तसेच घाट क्रमांक दोनचा लिलाव प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चरने ५ कोटी ११ लाख रुपयांना घेतलेला आहे.(स्रोत:लोकमत)
ठेकेदार कोर्टात
जानेवारीत एकूण ९ वाळू घाटांचा लिलाव झाला. यापैकी ४ घाटांना चांगला प्रतिसाद मिळाला. उर्वरित पाच घाटांना अल्प प्रतिसाद मिळाला . लिलावात भाग घेतलेल्या ४ ठेकेदारांनी २५ टक्के रक्कम भरून ते वाळू उपसाकरिता प्रतीक्षेत होते.
उर्वरित ७५ टक्के रक्कम भरण्याची तयारी देखील करीत होते . याच दरम्यान शासनाकडून नवीन धोरण जाहीर झाले . नवीन धोरणानुसार प्रति ब्रास अपसेट प्राइस ६५० रुपये इतका झाला. त्यामुळे शासकीय धोरणानुसार नवीन नियम लावून अल्प प्रतिसाद मिळालेल्या पाचपैकी चार वाळू घाटांचा फेरलिलाव झाला.
२५ टक्के रक्कम भरून ज्यांनी ठेका घेतला होता त्यांनी चार घाटांचा लिलाव रद्दची मागणी केली. हेच ठेकेदार आता कोर्टात गेले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज