सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आजपासून गावोगावी प्रचाराचा धुरळा उणार असून सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक इच्छुकांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने बहुतांंश इच्छुकांनी उमेदवारी अर्ज माघार ण्यासाठी निवडणूक कार्यालयासमोर गर्दी केली होती.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता गावातील प्रमुख मातब्बरांची टीम निवडणूक कार्यालयात दुपारी तीनपर्यंत तळ ठोकून होती.या निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण निश्चित नसल्याने बहुतांश गावातील दोन विरोधी गटांनी एकत्रित येत बिनविरोध निवडी करण्याचा प्रयत्न अखेरच्या दिवसापर्यंत सुरूच ठेवला होता.
यात बहुतांंश गावांना यशही आले आहे. काही गावांतील काही जागा बिनविरोध झाल्या असून चुरस असणार्या वॉर्डात निवडणूक लागली गेली आहे.
दुपारी तीनपर्यंत या प्रक्रियेत तहसील कार्यालयातील यंत्रणा व्यस्त होती. दुपारी तीननंतर निवडणूक लढविणार्या उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्याचे काम करण्यात आले.
सरपंचपदाचे आरक्षण निश्चित नसल्याने काही गावांनी जरी अविरोध निवडी केल्या असल्या तरी सरंपचपदाचे आरक्षण व त्यानंतर कोणाची निवड करायची यावरुन पुन्हा एकदा वाद होण्याचीही अनेक गावांत शक्यता निर्माण झाली आहे.
काही गावांनी सरळ दोन गटांत पॅनेल तयार करुन निवडणुकीस सामोरे जाणेच पसंत केले आहे. करमाळा तालुक्यातील निवडणूक होणार्या ग्रामपंचायतींपैकी एकही निवडणूक बिनविरोध झाली नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज