समाधान फुगारे । राज्यात गेले ४ महिने कोरोनाने हाहाकार माजवला असून मुंबई, पुण्यासारख्या शहरातील कोरोना आटोक्यात येत असला तरी राज्यातील नव्याने कोरोना संसर्गित होणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे, एकीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढणे हे जरी दिलासादायक असले, तरी नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमी होणे गरजेचे आहे.
सोमवारी, महाराष्ट्रात ९ हजार १८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २९३ रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये ६ हजार ११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही ५ लाख २४ हजार ५१३ इतकी झाली आहे.
ज्यापैकी १ लाख ४७ हजार ७३५ ऍक्टिव्ह केसेस आहेत. तर करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत १८ हजार ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ६८.३३ टक्के झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
पुण्यात सोमवारी केवळ ७६१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून गेल्या काही दिवसात २ हजार पार असलेला रोजचा आकडा हा १ हजारच्या आत आल्याने, मधल्या काळात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन केल्याचे आता चांगले परिणाम दिसून येत आहेत. तर एकूण रुग्णसंख्या हि ६६ हजार ७२७ झाले असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटद्वारे सांगितले.
So far 3 lakh 58 thousand 421 patients have been discharged in Maharashtra
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज