टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील अकोल येथे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. घराशेजारील शेततळ्यात पडून श्रेयश संतोष कदम या केवळ दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी सायंकाळी श्रेयश खेळत असताना अचानक शेततळ्यातील पाण्यात पडला.

त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. एका निष्पाप बालकाच्या अशा जाण्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेमुळे ग्रामीण भागात शेततळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












