टीम मंगळवेढा टाइम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पक्षाची अंतर्गत गटबाजी थांबवण्यासाठी जयंत पाटील कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.
यादरम्यान सरकारने नेमून दिलेल्या कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना पाहायला मिळालं. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली असली तरी नवा डेल्टा प्लस हा विषाणू डोकं वर काढत असताना पुन्हा एकदा नागरिकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यातच यावर्षीची आषाढी यात्रा व पायी वारी देखील रद्द करण्यात आली असून दिंडीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत.
एकीकडे महाराष्ट्र सरकारने कोरोना-या महामारी च्या पार्श्वभूमीवर दिंडीवर व आषाढी यात्रेवर निर्बंध लागू केले असतानाच दुसरीकडे राज्यातील मंत्र्यांच्या बैठकीला शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने कोरोना नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे चित्र पंढरपुरात पाहायला मिळालं.
पंढरपूरमध्ये संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यातच मंत्र्यांच्या बैठकीला शेकडो कार्यकर्ते कोरोनाचा विसर पडला असल्यासारखे उपस्थित राहिल्याने नियम हे फक्त सामान्य नागरिकांसाठी आहेत का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज