टीम मंगळवेढा टाईम्स ।
सेंद्रिय रसायनमुक्त रानभाज्या खायची आवड असणाऱ्या सर्व नागरिकांना आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका कृषी अधिकारी यांचे उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
थेट शेतकऱ्यांकडून भाजी जसे कडवंची, चिघळ, अंबाडी, चुका, माठ, चाकवत, आळू, पातर, सराटा, शेवगा, राजगिरा, घोळ, नळीची भाजी, आघाडा, अंबुशी खरेदी करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना मिळणार आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्यामार्फत उद्या पासून आठवडा बाजार येथील सेंद्रिय भाजीपाला कट्टा या भाजी विक्री शेडमध्ये रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
निसर्गाचा हा अनमोल ठेवा शहरीकरण, वृक्षतोड, जुन्या-जाणत्या पिढी कडून ज्ञान वारसा प्राप्त न केल्याने, बदलती जीवनशैली यामुळे रानभाज्या कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत.
कोणत्याही प्रकारे खताचा न वापर करता रसायनिक कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी न करता पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या चविष्ठ विविध आरोग्यास आवश्यक खनिजे, जीवनसत्वे व अन्नद्रव्य यांनी भरपूर असणाऱ्या रानभाज्या आपल्या आहारात असणे अत्यंत गरजेचे होऊन बसले आहे.
पिझ्झा बर्गर चिप्स च्या जमान्यात रानभाज्या चा वापर दररोजच्या आहारात अत्यल्प प्रमाणात किंवा नाहीसे झाल्यामुळे रोग प्रतीकर शक्ती सहाजिकच नाहीशी झालेली आहे. आरोग्यवर्धक रानभाज्या सर्व नागरिकांच्या आहारात रोज असाव्यात अन्नद्रव्यांची आरोग्यास आवश्यक खनिजे यांची कमतरता जाणवू नये रोग प्रतीकर शक्ती वाढावी.
तसेच शून्य उत्पादन खर्च करून शेताच्या बांधावरील आढळणाऱ्या माळरानावर आपोआप उगवून येणाऱ्या रानभाज्या विकून गोरगरीब शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत हा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा आहे. विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज