टीम मंगळवेढा टाईम्स ।
जवळपास तीन महिन्यानंतर महाराष्ट्राला पालकमंत्री मिळाले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
सोलापूरच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय प्रवास हा शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा राहिला आहे.
महाविकास आघाडीचा काळ सोडला तर सर्वच पक्षांच्या सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. पूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विखे-पाटील काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते होते.
त्यानंतर जून २०१९ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी गृहनिर्माण, परिवहन, शिक्षण ही खाती सांभाळली आहेत. युतीच्या सरकारमध्ये ते कृषीमंत्रीही होते.
आता त्यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यामुळे रखडलेली विकासकामे मार्गी लागण्याची आशा आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याहीचं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं नाही. दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पालकमंत्र्यावर शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. अजित पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले आणि आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदे सरकारला पालकमंत्र्यावरुन खडे बोल सुनावले होते. अखेर आज शिंदे सरकारनं पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.
जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:
देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे- सांगली
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार- हिंगोली
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर
भाजपकडे किती जिल्हे?
भाजपकडे 21 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे.
तर गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्याचं पालकमंत्री आलेय. मुंबई उपनगर, जालना, बीड, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, धुळे, लातूर, नांदेड, नंदुरबार, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली
15 जिल्हे शिंदे गटाकडे –
15 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या जबाबदारी शिंदे गटाला मिळाली आहे. सातारा, ठाणे, मुंबई शहर , कोल्हापूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, रत्नागिरी, रायगड,औरंगाबाद, यवतमाळ, वाशिम, नाशिक, बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे शिंदे गटाकडे आले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज