टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या व तालुक्याची राजकीय राजधानी असा लौकिक मिळवलेल्या मरवडे ग्रामपंचायतीची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार असून या ठिकाणी सुरु असलेल्या घडामोडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे .
सध्या मरवडे ग्रामपंचायतीवर छत्रपती परिवार पुरस्कृत स्वाभिमानी ग्रामविकास पॕनलची सत्ता असून पंचवार्षिक कालावधीत छोटी मोठी विकास कामे करुन जनतेच्या हृदयात स्थान मिळवले आहे.
जनतेच्या भावना ओळखून सत्ताधारी गटाला रोखणे सोपे नाही हे लक्षात घेऊन विरोधी सर्व गटांनी एकत्र येत पर्याय देण्याचा प्रयत्न चालविला आहे.
सर्व विरोधी गट निवडणूकीत एकसंध राहणार असतील आणि निवडणुकीनंतरही एकोप्याने गाव चालवणार असतील तर बिनशर्त माघार घेण्याची तयारी स्वाभिमानी पॕनलचे गटनेते संजय पवार यांनी दर्शविली होती. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होणार का ? याकडे जाणकारांचे लक्ष लागून राहिले होते.
मात्र परस्पर विरोधी टोकाचे मतभेद असलेले सर्व नेते एकत्र आल्याने सर्वसामान्य मरवडेकर जनतेने निवडणूक हातात घेत स्वाभिमानी पॕनलच्या पाठीशी ताकद उभी केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जनतेच्या पाठबळावर कार्यकर्त्यांच्या बैठकीत विचारविनिमय करुन पॕनल उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
छत्रपती परिवाराच्या कार्यकर्त्यांनी कल्पकतेने जनतेत मिसळून नेतेमंडळीच्या एकीकरणाच्या विरोधात सर्वसामान्य जानतेला एकत्र आणण्यात यश मिळवले. याच प्रयत्नांचा भाग नियमित जनतेशी संवाद घडावा यासाठी चाय पे चर्चा हा उपक्रम राबविला. दररोज सायंकाळी 7 वाजता 400/500 युवक कार्यकर्ते एकत्र येत असल्याने गावातील राजकीय वातावरण गुलाबी थंडीत देखील गरम झाले आहे.
सर्व विरोधी गट एकत्र आल्याने सत्ताधारी गटाला उमेदवार देखील मिळणार नाहीत अशा वल्गना महाआघाडी कडून केल्या जात होत्या. मात्र स्वाभिमानी ग्रामविकास पॕनलने 13 जागांसाठी संभाव्य 31 उमेदवारांची यादी छत्रपती शिवाजी चौकात जाहीर करुन नियोजनात मोठी आघाडी घेतली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज