मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । तालुक्यातील काही भागात रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यावर्षी ऋतुमान नियमित वर्षीप्रमाणे न झाल्याने अनेकांची उशिरा पेरणी झाली आहे. त्यामुळे शिवारातील शेतकऱ्यांची ज्वारी,हरभरा,करडई,सूर्यफूल,तूर,पिके अद्यापि शेतात आहेत.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून घेतले जी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान तळसंगी येथील हुग्गे यांच्या शेतात नारळाच्या झाडावरती वीज कोळसली आहे.तर सलगर (बु) परीसरात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे
.
मंगळवेढा तालुक्यात डाळींब व द्राक्ष फळबागांची संख्या जास्त असून या अवकाळी पावसाचा फटका बागायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील बसला आहे. त्यामुळे त्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.सध्या आंब्याचा बहर चांगल्याप्रकारे आला होता. मात्र या अवकाळी पावसाने फटका बसणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी, बोराळे, ब्रह्मपुरी, रहाटेवाडी, तमदर्डी, पाटखळ, खोमनाळ, भाळवणी, मारोळी, शिरनांदगी, या भागात पावसाच्या हलक्या सरी झाल्या.
पहिल्या कर्जातून मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या सरकारने काही प्रमाणात कर्जमुक्तीचा दिलासा दिला असला तरी चालू पीक हाता तोंडाला आले असून निसर्गाच्या अवकृपेने तेही हिरावुन जाण्याची शक्यता दिसत आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । तालुक्यातील काही भागात रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यावर्षी ऋतुमान नियमित वर्षीप्रमाणे न झाल्याने अनेकांची उशिरा पेरणी झाली आहे. त्यामुळे शिवारातील शेतकऱ्यांची ज्वारी,हरभरा,करडई,सूर्यफूल,तूर,पिके अद्यापि शेतात आहेत.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून घेतले जी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान तळसंगी येथील हुग्गे यांच्या शेतात नारळाच्या झाडावरती वीज कोळसली आहे.तर सलगर (बु) परीसरात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे
.
मंगळवेढा तालुक्यात डाळींब व द्राक्ष फळबागांची संख्या जास्त असून या अवकाळी पावसाचा फटका बागायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील बसला आहे. त्यामुळे त्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.सध्या आंब्याचा बहर चांगल्याप्रकारे आला होता. मात्र या अवकाळी पावसाने फटका बसणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी, बोराळे, ब्रह्मपुरी, रहाटेवाडी, तमदर्डी, पाटखळ, खोमनाळ, भाळवणी, मारोळी, शिरनांदगी, या भागात पावसाच्या हलक्या सरी झाल्या.
पहिल्या कर्जातून मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या सरकारने काही प्रमाणात कर्जमुक्तीचा दिलासा दिला असला तरी चालू पीक हाता तोंडाला आले असून निसर्गाच्या अवकृपेने तेही हिरावुन जाण्याची शक्यता दिसत आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज