टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी शिवारात हरभरा, करडईच्या खळ्यावरील धान्य खाल्याने पोटफुगी मुळे गेल्या आठ दिवसात ४० शेळ्या मेंढ्या व लहान पिल्ले मृत पावल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्यांना मार्च एण्डच्या काळात आर्थिक भुर्दंड बसल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. खळ्यावरील पडलेले हरभरे भराभरा खाऊन पाणी पिल्याने शेळ्या मेंढ्या यांची पोट फुगून व काहींचे पोट बिघडल्याने शेळ्या मेंढ्या दगावल्या आहेत.
येथील शिवाजी दवले, दत्ता माने, सुभाष दवले, नवनाथ दवले, जगन्नाथ घोडके, रोहिदास शिंदे यांच्यासह येथील शेतकऱ्यांच्या सुमारे ४० शेळ्या मेंढ्या व पिल्ले पोटफुगीने मृत पावली आहेत,
येथील पशुवैद्यकीय अधिकारी बंडगर यांनी ज्या शेतकऱ्यांनी संपर्क साधला त्यांच्या शेळ्यांमेंढ्यावर उपचार केले. परंतु काही वाचल्या तर काही मरण पावल्या आहेत.
कोल्हापूरहून आलेल्या मेंढपालांच्या देखील शेळ्या मेंढ्या मयत झाल्या आहेत. उपचारासाठी खर्च करून ही त्यांच्या शेळ्या दगावल्याने दुहेरी नुकसान झाले असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपचारासाठी केला पाच हजार खर्च
हरभऱ्याच्या खळ्यावरील भुस्कट चारल्यानंतर चार शेळ्या मयत झाल्या असून उपचारासाठी पाच हजार खर्च केले , तरीदेखील शेळ्या मेल्याने ३५ हजाराचे नुकसान झाले आहे.- शिवाजी दवले , शेतकरी , भालेवाडी
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज