मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश 22 मार्चपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा टप्पा पुन्हा वाढविण्याच निर्णय झाला आहे. मात्र, आता कोरोनाबाधित रुग्णांच्या आलेखावरून प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून कमी-अधिक प्रमाणात उद्योग, व्यवसाय व सेवा सुरू केल्या जाणार आहेत. पावसाळा सुरू होणार असल्याने नागरिकांची सुरक्षितता म्हणून छत्री रेनकोट व प्लास्टिकचे कव्हर व शिट्स तयार करण्याला परवानगी देण्यात आल्याचे राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पावसाळ्यात विविध प्रकारचे साथीचे रोग व आजार यांचा प्रादुर्भाव वाढत असतो . सर्दी , खोकला यासह अन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी खबरदारी म्हणून नागरिक छत्री , रेनकोट खरेदी करतात . मात्र , आता लॉकडाऊनमुळे हे सर्व उद्योग , व्यवसाय बंदच आहेत . त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होवू शकते आणि आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढू शकते . या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील छत्री , रेनकोट व प्लॅस्टिकचे कव्हर निर्मितीच्या व्यवसायांना परवानगी दिले आहे . तयार केलेल्या वस्तू संबंधित व्यवसायिक ग्राहकांना विक्रीही करू शकतील असेही या आदेशात म्हटले आहे.
राज्यात आगामी काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे . परंतु , राज्यातील लॉकडाऊनमुळे पावसाळ्यात अत्यावश्यक असलेल्या छत्री , रेनकोट यासह अन्य वस्तू निर्मितीचे व्यवसाय पूर्णपणे बंदच आहेत . पावसाळ्यात या वस्तू नागरिकांसाठी अत्यावश्यक असल्याने अत्यावश्यक वस्तूंचे ( सेवेचे ) सर्व नियम या व्यवसायांसाठी लागू राहतील , असेही राज्याचे मुख्य सचिव मेहता यांच्या पत्रात म्हटले आहे.
——————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश 22 मार्चपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा टप्पा पुन्हा वाढविण्याच निर्णय झाला आहे. मात्र, आता कोरोनाबाधित रुग्णांच्या आलेखावरून प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून कमी-अधिक प्रमाणात उद्योग, व्यवसाय व सेवा सुरू केल्या जाणार आहेत. पावसाळा सुरू होणार असल्याने नागरिकांची सुरक्षितता म्हणून छत्री रेनकोट व प्लास्टिकचे कव्हर व शिट्स तयार करण्याला परवानगी देण्यात आल्याचे राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पावसाळ्यात विविध प्रकारचे साथीचे रोग व आजार यांचा प्रादुर्भाव वाढत असतो . सर्दी , खोकला यासह अन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी खबरदारी म्हणून नागरिक छत्री , रेनकोट खरेदी करतात . मात्र , आता लॉकडाऊनमुळे हे सर्व उद्योग , व्यवसाय बंदच आहेत . त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होवू शकते आणि आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढू शकते . या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील छत्री , रेनकोट व प्लॅस्टिकचे कव्हर निर्मितीच्या व्यवसायांना परवानगी दिले आहे . तयार केलेल्या वस्तू संबंधित व्यवसायिक ग्राहकांना विक्रीही करू शकतील असेही या आदेशात म्हटले आहे.
राज्यात आगामी काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे . परंतु , राज्यातील लॉकडाऊनमुळे पावसाळ्यात अत्यावश्यक असलेल्या छत्री , रेनकोट यासह अन्य वस्तू निर्मितीचे व्यवसाय पूर्णपणे बंदच आहेत . पावसाळ्यात या वस्तू नागरिकांसाठी अत्यावश्यक असल्याने अत्यावश्यक वस्तूंचे ( सेवेचे ) सर्व नियम या व्यवसायांसाठी लागू राहतील , असेही राज्याचे मुख्य सचिव मेहता यांच्या पत्रात म्हटले आहे.
——————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज