मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सध्या भारतात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून याची खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे.त्यात कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार असून, 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज म्हणजे भगव्या पट्ट्यात येतील आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे हरित पट्ट्यात समाविष्ट होतील.या भगव्या आणि हिरव्या पट्ट्यांतील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी व्हिडिओ संवाद साधला.याच संवादात कोरोना रुग्णसंख्येनुसार शहरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्राने दिले. येत्या एक दोन दिवसात केंद्राकडून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, केंद्र सरकारने 15 आणि त्यापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या भागाला रेड झोन म्हणून जाहीर करावे, 15 पेक्षा कमी रुग्ण असलेल्या भागाला ऑरेंज झोन म्हणून तर एकही रुग्ण नसेल अशा भागाला ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात. म्हणजे या दोन झोनमध्ये येणार्या जिल्ह्यांच्या सीमा सील करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरू करण्यावर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना हाती येताच तसा निर्णय होऊ शकतो. जे उद्योग आपल्या कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची हमी देतील, तेथे तशी व्यवस्था करतील आणि कामगारांची व्यवस्था कारखान्यातच करतील, असे उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही टोपे म्हणाले.
मुंबई,पुणे,ठाणे पालघरचे लॉकडाऊन शिथील होणे कठीण
राज्यातील एकूण कोरोना रूग्णांच्या 91 टक्के रुग्ण हे मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेत. एकट्या मुंबईत 1652 पैकी 61 टक्के रुग्ण आहेत. पुण्यात 20 टक्के तर 10 टक्के रुग्ण हे ठाणे आणि पालघरमध्ये आहेत. फक्त 9 टक्के रुग्ण हे राज्याच्या अन्य भागात आहेत. त्यामुळे या भागात लॉकडाऊन अधिक कडक करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे केंद्राने काही प्रमाणात लॉक डाऊन शिथील केली तरी मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात लॉक डाऊन शिथील होणे कठीण आहे.
ग्रीन झोन । धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली
ऑरेंज झोन । रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, गोंदिया.
रेड झोन । मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड सांगली, औरंगाबाद
—-—————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सध्या भारतात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून याची खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे.त्यात कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार असून, 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज म्हणजे भगव्या पट्ट्यात येतील आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे हरित पट्ट्यात समाविष्ट होतील.या भगव्या आणि हिरव्या पट्ट्यांतील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी व्हिडिओ संवाद साधला.याच संवादात कोरोना रुग्णसंख्येनुसार शहरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्राने दिले. येत्या एक दोन दिवसात केंद्राकडून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, केंद्र सरकारने 15 आणि त्यापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या भागाला रेड झोन म्हणून जाहीर करावे, 15 पेक्षा कमी रुग्ण असलेल्या भागाला ऑरेंज झोन म्हणून तर एकही रुग्ण नसेल अशा भागाला ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात. म्हणजे या दोन झोनमध्ये येणार्या जिल्ह्यांच्या सीमा सील करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरू करण्यावर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना हाती येताच तसा निर्णय होऊ शकतो. जे उद्योग आपल्या कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची हमी देतील, तेथे तशी व्यवस्था करतील आणि कामगारांची व्यवस्था कारखान्यातच करतील, असे उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही टोपे म्हणाले.
मुंबई,पुणे,ठाणे पालघरचे लॉकडाऊन शिथील होणे कठीण
राज्यातील एकूण कोरोना रूग्णांच्या 91 टक्के रुग्ण हे मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेत. एकट्या मुंबईत 1652 पैकी 61 टक्के रुग्ण आहेत. पुण्यात 20 टक्के तर 10 टक्के रुग्ण हे ठाणे आणि पालघरमध्ये आहेत. फक्त 9 टक्के रुग्ण हे राज्याच्या अन्य भागात आहेत. त्यामुळे या भागात लॉकडाऊन अधिक कडक करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे केंद्राने काही प्रमाणात लॉक डाऊन शिथील केली तरी मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात लॉक डाऊन शिथील होणे कठीण आहे.
ग्रीन झोन । धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली
ऑरेंज झोन । रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, गोंदिया.
रेड झोन । मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड सांगली, औरंगाबाद
—-—————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज