टीम मंगळवेढा टाईम्स।
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या.
यात सहानुभूतीची लाट आणि महाविकास आघाडीची व्यूहरचना एकोपा कामी आला.
याच पद्धतीने उमेदवाराची निवड आणि महाआघाडीतील नेत्यांची मोटबांधणी झाली असती तर दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके विजयी झाल्या असत्या , अशी चर्चा शनिवारी दिवसभर ऐकायला मिळाली.
स्व.आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली.
राष्ट्रवादीतील काही नेते जयश्री भालके यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी करीत होते; परंतु भालके गटातील काही युवा नेत्यांनी भगीरथ भालके यांनाच उमेदवारी मिळायला हवी, असा आग्रह धरला.
राष्ट्रवादी नेत्यांचा होरा आला अंगलट
राष्ट्रवादीच्या विरोधकांचे बेरजेचे गणित जुळून येईल याचा अंदाज नव्हता. माजी आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांचा गट एकत्र येणार नाही आलाच तर अवताडे यांना मतदान होणार नाही असा नेत्यांचा होरा होता.
भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळणार हे पक्के झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली.
लगेच मोहिते-पाटलांशी जुळवून घेतले. मोहिते पाटलांनी परिचारकांसोबत झालेले वाद बाजूला ठेवले. या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेते ही एकत्र आले.
याउलट काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचा एक नेता तर अवताडे यांच्या बाजूने राहिला.
पकड राहिली नाही !
कोल्हापूरप्रमाणे पंढरपुरात पुरोगामी चळवळीची ताकत आहे. पंढरपूरच्या निवडणुकीत विचार हा मुद्दाच चर्चेला आला नाही. सतेज पाटील यांच्यासारखा स्थानिक मंत्री नसल्याने यंत्रणेवर पकड राहिली नाही. दिवंगत नेत्याच्या मुलाच्या बाजूने सहानुभूती दिसली नाही.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज