टीम मंगळवेढा टाईम्स । गलवान खोऱ्यामधील तणावानंतर नौदलाचे मुंबईतील पश्चिम कमांड दक्ष झाले आहे. कमांडमधील बहुतांश युद्धनौका अरबी समुद्रात तळ ठोकून आहेत. गरज भासल्यास २४ तासांत युद्ध सज्जतेमध्ये परावर्तित करण्याची तयारी नौदलाने केली आहे.Tensions on the India-China Line of Control; Navy boats ready in the Arabian Sea
भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील घटनेनंतर देशभरातील सुरक्षा दलांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्येच पश्चिम कमांडचाही समावेश आहे. मुंबईतील कमांड मुख्यालयाला थेट दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या नसल्या तरी कमांडने स्वत:च्या स्तरावर सज्जतेची तयारी सुरू केली आहे.
कमांडमधील सूत्रांनुसार, ‘लॉकडाउनमुळे सध्या तशीही नौकांची दुरुस्ती जवळपास बंद आहे. करोना संक्रमण टाळण्यासाठी बहुतांश युद्धनौका सध्या अरबी समुद्रातच गस्तीवर आहेत. या नौकांशी संबंधित अधिकारी व नौसैनिकांनाही करोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी वेगळे ठेवण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नौदल सज्ज आहे. संरक्षण मंत्रालयाकडून नेमकी सूचना आल्यास पश्चिम नौदल कमांडमधील युद्धनौका २४ तासांत युद्धसज्ज स्थितीत जाऊ शकतात. तशी तयारी आहे.’
चीनी युद्धनौका याआधी दक्षिणेकडील हिंदी महासागरापर्यंत आल्या होत्या. अद्याप त्या अरबी समुद्रात दिसलेल्या नाहीत. परंतु गलवान खोऱ्यातील पार्श्वभूमीवर चीनकडून अरबी समुद्रात आगळीक होऊ नये यासाठी पश्चिम कमांडमधील युद्धनौका दक्ष झाल्या आहेत. दुसरीकडे, जगातील ७० टक्के मालवाहतूक अरबी समुद्रातून होते. चीनची तर ९० टक्के मालवाहतूक ही अरबी समुद्रावर अवलंबून आहे. यामुळेच मुंबईतील पश्चिम कमांडअंतर्गत नौदल या समुद्रावर बारकाईने नजर ठेऊन आहे. भारतीय नौदलाचा तेथे दबदबा आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज