टीम मंगळवेढा टाईम्स । पत्रकारांना अत्यंत तुटपुंजा पगार असतो ब-याचशा पत्रकार मग तो प्रिंट मिडीयाचा असो किंवा इक्ट्रॉनिक्स मिडीयाचा असो सर्वांच्या अडीअडचणीत न्याय मिळवून देणारे पत्रकारच अडचणीत आले आहेत. पत्रकारांना विशेष आर्थिक मदतीचे पॅकेजही लवकरात लवकर जाहीर करावे , अशी मागणी डॉ . धवलसिंह महिते पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
लोकशाहीचा चौथा खांब असलेली पत्रकारिता हा समृध्द समाजाचा भक्कम आधार आहे. शासन आणि जनतेमधील मुख्य दुवा असणारा हा खांब राज्यात कोरोना सारख्या महाविषाणूचा फैलाव जोरात सुरु असतानाही जागृत पत्रकारिता करीत आहेत.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जनता करफू व लॉकडाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले आहेत. यासाठी पोलीस , डॉक्टर व त्यांचा स्टाफ , प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार , प्रेस फोटोग्राफर बांधवही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती व प्रसिद्धि करीत आहेत आहेत अशा पत्रकारांना ५० लाख रुपये विमा कवच दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.
Give financial package to journalists as soon as possible: Dr. Dhawalsingh Mahite Patil
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज