गेल्या महिन्यात झालेल्या पुर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील 81 गावातील 36 हजार शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर 50 टक्के प्रमाणे 19 कोटी 98 लाखाचे अनुदान वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली.
13 ते 20 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यामध्ये जिरायत क्षेत्र 15455.94 हेक्टर तर बाधित शेतकऱ्यांची संखा 20484 एवढी होती.
तसेच 10283.74 हेक्टर बागायती क्षेत्रील बाधित शेतकऱ्यांची संख्या 12584 एवढी आहे. फळपिकाखालील बाधित क्षेत्र 5763.83 बाधीत शेतकरी 7751 आहेत. तालुक्यातील 40819 इतके शेतकरी बाधीत झाले
तर 31503.51 बाधीत हेक्टरच्या नुकसानीपोटी 34 कोटी 76 लाख 79 हजार 822 एवढया रकमेची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 60 टक्के म्हणजे 20 कोटी 96 लाख 64 हजार रक्कम आली.
या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तालुक्यातील महसूल, कृषी आणि ग्रामसेवक ही पदे रिक्त असताना प्रांताधिकारी उदयसिंह भोसले व तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी पंचनामे तातडीने पूर्ण करण्यासाठी 101 कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली.
या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पंचनामे करून शासनाच्या हेक्टरी दहा हजार रुपये व फळबाग शेतकऱ्यांना 25 हजार रुपये अशा पद्धतीने या याद्या तयार करण्यात आल्या परंतु याबाबतचे आदेश नसल्याने जुन्या शासन निर्णयाचा आधार घेऊन जिरायत शेतकऱ्यांना 6800, बागायत शेतकऱ्यांना 13500 व फळबाग शेतकऱ्यांना 18000 रुपये प्रमाणे याद्या तयार केल्या.
दरम्यान शासनाच्या सुधारित आदेश प्राप्त झाल्यामुळे नव्या आदेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांनी वेगाने कार्यवाही केली. सध्या जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या रकमेतून 50 टक्के प्रमाणे रक्कम आणि दिवाळी सणाच्या तोंडावर प्रशासनाने अहोरात्र कष्ट करून कारखाना शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर वर्ग केले.
दरम्यान प्रक्रिया सुरू असताना अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित झालेला फटका देखील बसला. तरीही प्रशासनाने गतीने प्रक्रिया राबविली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज