टीम मंगळवेढा टाईम्स ।
वाळू ठेक्याची मुदत संपूनही वाळूचा उपसा मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर येथे सुरु आहे, तो थांबवावा ; अन्यथा १८ जुलै रोजी आपण मुंबईत मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहोत, असा इशारा गणेश सुभाष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पत्रकार परिषदेत गणेश चव्हाण म्हणाले, घोडेश्वर येथे १५००० ब्रास वाळू उपसा करण्यासाठी एका कंपनीला ठेका देण्यात आला होता.
दि.९ जूनपर्यंत मुदत होती. पण अजूनही रात्रंदिवस वाळू उपसा सुरु आहे. याबाबतचं चित्रीकरण आपण केलं आहे. ते संबंधीत महसूल यंत्रणांपर्यंत पोहचवलं, पोलिसांनाही माहिती दिली.
कोणीच दखल घेत नसल्यानं आपण आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचे निवेदन आता थेट राष्ट्रपती , मुख्यमंत्री, मुख्य न्यायाधीश आणि हायकोर्ट यांना पाठविण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज