टीम मंगळवेढा टाईम्स।
धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटने लोकांमध्ये विश्वास निर्माण करून सहकार क्षेत्रात नावलौकिकता मिळवली आहे. हे खऱ्या अर्थाने धनश्री परिवारातील आर्थिक संस्थेचे मोठे यश आहे. असे प्रतिपादन आ. समाधान आवताडे यांनी केले.
मंगळवेढा येथे बुधवार दि. १७ जानेवारी रोजी धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त
तसेच धनश्री महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आ. समाधान आवताडे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत हे होते.
याप्रसंगी व्यासपीठावर धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे, संग्राम कचरे, डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, ॲड. दिपाली काळुंगे-पाटील, डॉ. पद्माकर अहिरे, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील,
डॉ. भाऊसाहेब जानकर, विष्णुपंत आवताडे, डॉ. शिवाजीराव पवार, डॉ. भीमाशंकर बिराजदार, युवराज गडदे, बाबूराव शिंदे, बबन सरवळे, ईश्वर गडदे, रामचंद्र बंडगर, अविनाश चव्हाण, सीमा काळुंगे, सुयोग गायकवाड, पप्पू काकेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे आ समाधान आवताडे म्हणाले, मोठया विश्वासाने प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभाताई काळुंगे यांनी आज धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या माध्यमातुन १५०० कोटीच्या ठेवी जमा केल्या आहे. ही मंगळवेढेकारासाठी मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
आर्थिक क्षेत्रात काम करताना संवेदनशीलपणे निर्णय घेण्याची क्षमता शिवाजीराव काळुंगे यांच्यामध्ये आहे. तसेच आर्थिक चळवळीला शिस्त लावण्याचे काम शोभाताई काळुंगे यांनी केले आहे.
प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले, सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत धनश्री व सिताराम परिवाराने वाटचाल सुरू ठेवली आहे. एकीकडे देशाला आदर्श असणारे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र आज ग्रामीण विकासापासून ते राष्ट्रीय विकासापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग मंगळवेढाच्या वैभवशाली विकासात धनश्री परिवारातील धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटचा मोठा हातभार आहे.
प्रकृती सुदृढ ठेवणे हे आपल्या हातात असून वेळोवेळी त्याची तपासणी केली तरच प्रकृती सुदृढ होईल, आणी प्रकृती सुदृढ झाली की, कुटुंब, गाव, आणी समाज देखील सुदृढ होईल या हेतूने मंगळवेढा येथे प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवी निमीत्त सर्वसामान्य नागरिकाला महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून
आरोग्य सुविधा व सेवा उपलब्ध व्हावी याकरीता राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे. याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा नक्की होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजित घुले यांनी केले तर आभार ज्ञानदेव जावीर यांनी केले आहे.
आरोग्य शिबिरात दीड हजारहून अधिक रुग्णांनी यावेळी लाभ घेतला
या आरोग्य शिबिरात दीड हजारहून अधिक रुग्णांनी यावेळी लाभ घेतला यामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, हाडांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, दंत तपासणी, हृदयरोग तपासणी, औषधे वितरण, चष्यांचे वितरण, इसीजी तपासणी, रक्तगट तपासणी, रक्तक्षय तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, आयुष्यमान कार्ड वितरण सुविधा या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज