टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना व्हायरस अर्थात ‘कोविड 19’ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 1 ली ते इ. 12 वीसाठी सुमारे 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास राज्य सरकारकडूनही मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. Decision to reduce 1st to 12th standard syllabus by 25%
पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. २०२० आणि २१ हे शैक्षणिक वर्ष सुरु केलं आहे. ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून आपण हे वर्ष सुरु केलं आहे. प्रत्यक्षात शाळा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मुलांच्या मनात तणाव राहू नये, त्यांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 1 ली ते इ. 12 वी साठी सुमारे 25% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली. @scertmaha @CMOMaharashtra @bb_thorat @AjitPawarSpeaks pic.twitter.com/XjSdQZKHAQ
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 25, 2020
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परिक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मार्च २०२० पासून कोविड १९ या करोना विषाणूचा प्रादुर्भाव जगामध्ये झालेला आहे. त्यामुळे राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च २०२० पासून राज्यामधली सगळी शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. दरवर्षी साधारणतः जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होत असते. २०-२१ या शैक्षणिक वर्षातही शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र त्यांचं स्वरुप ऑनलाइन, टीव्हीच्या माध्यमातून होतं. मात्र मुलांवर, विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये म्हणून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असे आहेत नवे नियम – वाचा
-Pre Primary – पालक आणि मुलांसाठी ठरवून दिलेल्या दिवशी फक्त 30 मिनिटे
-Class 1 to 12 – सगळ्यांसाठी NCERTने अभ्यासक्रम आखून दिला आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम घेतला जावा.
-Class 1 to 8 – प्रत्येक दिवशी 30- 45 मिनिटांचे दोन सेशन्स. त्यापेक्षा जास्त नको
-Class 9 to 12 – प्रत्येक दिवशी 30- 45 मिनिटांचे चार सेशन्स.
या व्यतिरिक्त काही गृहपाठ देऊन इतर उपक्रम राबविण्याची शिफारसही केंद्रीय मंत्रालयाने केली आहे. सतत स्क्रिन समोर राहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सतत घरी बसून राहिल्यामुळे त्यांच्या खेळण्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे व्यायाम होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या जडण घडणीवर होऊ शकतो.
या सगळ्यांचा विचार करून शाळा-पालक आणि विद्यार्थी यांनी मिळून या संकटाच्या काळात पुढे गेलं पाहिजे असं मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज