टीम मंगळवेढा टाईम्स ।
सध्या महावितरणने वीज बिल वसुलीसाठी गावोगावी शेतकऱ्यांच्या शेतपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.
त्यामुळे त्रस्त झालेल्या अरळी (ता . मंगळवेढा) येथील शेतकरी असणाऱ्या आमगोंडा पाटील यांनी या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सध्या महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून वीज बिल वसुलीसाठी दंडेलशाही सुरू असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
त्यात अरळी येथील शेतकरी पैसे भरण्यास तयार असताना आम्ही मागेल तेवढेच पैसे भरा अन्यथा वीज पुरवठा सुरू होणार नाही, असे गावातील झीरो वायरमन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
मला त्या शेतकऱ्यांचा फोन आला. मी सूरज जाधव सारखे विष पिऊन आत्महत्या करीत आहे, असे सांगितले.
शेतकऱ्यांच्या जिवाचे बरेवाईट झाले तर याचे वाईट परिणाम यांना भोगावे लागतील असा इशारा स्वाभीमानीचे सचिन पाटील यांनी दिला आहे.
मला अरळी येथे एक शेतकरी वीज खंडित केल्यामुळे औषध पिऊन आत्महत्या करणार असल्याबद्दल माहिती मिळताच तत्काळ गावात जाऊन संबंधित शेतकऱ्यांची समजूत काढली. त्याचे शेतपंपाचे कनेक्शनही जोडून दिले.
झालेल्या घटनेबाबत याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली आहे. असे शाखा अभियंता जनार्धन काकी यांनी सांगितले.
आ.समाधान आवताडे यांनी लक्ष देण्याची मागणी
दरम्यान, आ.समाधान आवताडे यांनी या झालेल्या घटनेची गंभीरता ओळखून अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज