टीम मंगळवेढा टाईम्स।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर काल मोठ्या उत्साहात पार पडला. गर्दी जमविण्यासाठी दोन्ही बाजूने संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली होती. हळूहळू मैदानावर गर्दी जमायला लागली होती.
दोन्ही गटांच्या मेळाव्याची उत्सुकता आता शिगेला पोहचली होती. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत होते.
तर दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे.
दरम्यान शिंदे गटाकडून शहाजीबापू पाटिल यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत.
शहाजीबापू यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले “उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांची सभा नेहमी टीव्हीवरुन पाहिली आहे.”
तर शरद पवारांनवर टीका करतांना म्हणाले शिवसेना प्रमुख कुणाला मैद्याचं पोतं म्हणाले, शरद पवारांच, बिनधास्त नाव घ्या अजिबात लाजू नका. तर अजित पवारांना ममद्या म्हणाले होते. याची आठवण शहाजी पाटील यांनी यावेळी करुन दिली.
अडीच वर्ष राज्याचे तुकडे केले आहेत. आता आणखी काय करणार आहात असं म्हणत महाविकास अघाडीवर टीका केली. (स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज