टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे दिगवंत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर भालके गटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर ते बरेच दिवस नॉटरीचेबल राहिले होते.
आपला नेता नॉटरीचेबल असल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले कामासाठी कोणाकडे जायचे ? हा मोठा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता.
त्यानंतर विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत सुद्धा भगीरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला.
दामाजीत मात्र त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी परिचारक गट पुरस्कृत समविचारी पॅनलने दणदणीत विजय मिळवला.
उद्या बैठकीचे आयोजन
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भालके गट आक्रमक झाला आहे. उद्या 4 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केली आहे.
लोकसेवेचा वसा परत तालुक्यात आणण्यासाठी निर्धार
तसेच लोकनेते भारत नाना भालके फौंडेशन च्या आता प्रत्येक गावात शाखा काढून प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन स्व.नानांच्या विचारांची आणि लोकसेवेचा वसा परत तालुक्यात आणण्यासाठी सर्व नाना प्रेमी युवकांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार केला आहे.
दरम्यान, स्व.भारत भालके यांच्या सारखा रांगडा स्वभाव, द्रातूत्व, नेतृत्व अंगात विकसित करूनच यापुढे भगीरथ भालके यांना काम करावे लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज