मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघात अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव काळुंगे यांच्यावर पक्षाच्या वरीष्ठ मंडळींकडून अर्ज माघारीसाठी दबाव वाढत असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची आघाडी असताना सुद्धा या मतदारसंघात दोन्ही पक्षाने वेगवेगळे उमेदवारांना एबी फॉर्म दिला असून काँग्रेस चे शिवाजीराव काळुंगे यांनी माघार घ्यावी यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.पण काळुंगे हे रविवार पासून अद्यापही ‘नॉट रिचेबल’च असल्याने मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या गोटात मात्र धाकधूक वाढली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्फत शिवाजीराव काळुंगे यांनी अर्ज काढून घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
आघाडी असून देखील दोन्ही उमेदवार उभे राहिले तर मतदारांमध्ये मोठी संभ्रम अवस्था निर्माण होईल.आज दुपारी तीन वाजता चित्र स्पष्ट होणार असून अनेकांचे लक्ष याकडे लागून राहिले आहेत.
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघात अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव काळुंगे यांच्यावर पक्षाच्या वरीष्ठ मंडळींकडून अर्ज माघारीसाठी दबाव वाढत असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची आघाडी असताना सुद्धा या मतदारसंघात दोन्ही पक्षाने वेगवेगळे उमेदवारांना एबी फॉर्म दिला असून काँग्रेस चे शिवाजीराव काळुंगे यांनी माघार घ्यावी यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.पण काळुंगे हे रविवार पासून अद्यापही ‘नॉट रिचेबल’च असल्याने मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या गोटात मात्र धाकधूक वाढली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्फत शिवाजीराव काळुंगे यांनी अर्ज काढून घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
आघाडी असून देखील दोन्ही उमेदवार उभे राहिले तर मतदारांमध्ये मोठी संभ्रम अवस्था निर्माण होईल.आज दुपारी तीन वाजता चित्र स्पष्ट होणार असून अनेकांचे लक्ष याकडे लागून राहिले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज