मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ सुसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे येत आहेत. निमित्त दुष्काळाचे असले तरी चाचपणी मात्र लोकसभेचीच सुरू असल्याचे बोलले जात आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
मंगळवेढा तालुक्यात असलेली काँग्रेसची दुफळी संपवून नवीन कार्यकर्ते जोडले तर काँग्रेसचा लोकसभेचा मंगळवेढ्यातील मार्ग सुकर होईल. १० वर्ष सोलापूर लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेले सुशीलकुमार शिंदे मोदी लाटेत तग धरू शकले नव्हते. मात्र चार वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. सध्या लोकसभेसाठी त्यांच्याशिवाय काँग्रेसकडे दुसरा तगडा उमेदवार नाही. दुसरीकडे भाजपचे खासदार शरद बनसोडे यांनी केलेले काम जनतेला आवडले नसले तरी त्यांनी दिलेला निधी प्रत्येक गावात पोहोचला आहे.
मात्र शिंदे यांचा निधी स्थानिक नेता सांगेल त्याच गावात दिला गेला असल्याचे तक्रारी आहेत.चार वर्षात जनतेचा संपर्क कमी झालेल्या सुशीलकुमार शिंदे यांना आता लोकसभेची बांधणी करताना नवीन कार्यकर्ते जोडावे लागणार आहेत. त्यांनीच मंजूर केलेल्या पंढरपूर-विजापूर रेल्वे प्रश्नात प्रगती नाही. ३५ गावचा पाणी प्रश्न लटकलेला आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील लाभार्थी दुष्काळ जाहीर होऊन उपायोजना नाहीत, बंद असलेली आंधळगाव व नंदुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, केंद्र शासनाच्या मनरेगाच्या कामगारांच्या गेल्या अडीच महिन्यांपासून पगार नाही, घरकुलाचे अपुरे उद्दिष्ट, स्वच्छ भारत योजनेत तालुक्यातील कुटुंबाकडे स्वच्छतागृहाचा अभाव तरीही तालुका हागणदारी मुक्त या सर्व बाबी मतदारांना पटवून देऊन त्यांच्या मतात बदल करण्याचे आवाहन सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर आहे.
इथल्या मूलभूत प्रश्नांसाठी शिंदेंना जनतेत जाऊ न देण्याचा प्रयत्न येथील स्थानिक नेत्यांनी केल्याचा आरोपही होत आहे. याचा त्यांना फटका बसला असला तरी पुन्हा लोकसभा लढवायची असेल त्यांना जनतेत जाणे गरजेचे आहे.स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवला तर त्याचे परिणाम होऊ शकतात गत चार वर्षात तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.
चार वर्षे या प्रश्नावर काँग्रेसमधील आमदार भारत भालके वगळता कोणीही आवाज उठवला नाही किंवा कॉंग्रेसला लाभ होईल असे प्रभावी आंदोलन केले नसल्याचे चित्र आहे.
जनसंघर्ष यात्रेत पोस्टरवर घुमले..
शेतकरी,कामगार,आरक्षण आदी मुद्यांवरून जनतेत सरकारी विषयी नाराजीच्या लाभासाठी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत येथील काँग्रेसमधला छुपा संघर्ष चव्हाट्यावर आला होता.भरचौकात लावलेल्या डिजिटल फलकावर एका गटाने आमदार भारत भालके यांना तर दुसऱ्या गटाने काळुंगे यांना गायब करून गटबाजीचे प्रदर्शन केले होते.या गटबाजीचा भविष्यात फटका बसू शकतो.
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ सुसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे येत आहेत. निमित्त दुष्काळाचे असले तरी चाचपणी मात्र लोकसभेचीच सुरू असल्याचे बोलले जात आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
मंगळवेढा तालुक्यात असलेली काँग्रेसची दुफळी संपवून नवीन कार्यकर्ते जोडले तर काँग्रेसचा लोकसभेचा मंगळवेढ्यातील मार्ग सुकर होईल. १० वर्ष सोलापूर लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेले सुशीलकुमार शिंदे मोदी लाटेत तग धरू शकले नव्हते. मात्र चार वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. सध्या लोकसभेसाठी त्यांच्याशिवाय काँग्रेसकडे दुसरा तगडा उमेदवार नाही. दुसरीकडे भाजपचे खासदार शरद बनसोडे यांनी केलेले काम जनतेला आवडले नसले तरी त्यांनी दिलेला निधी प्रत्येक गावात पोहोचला आहे.
मात्र शिंदे यांचा निधी स्थानिक नेता सांगेल त्याच गावात दिला गेला असल्याचे तक्रारी आहेत.चार वर्षात जनतेचा संपर्क कमी झालेल्या सुशीलकुमार शिंदे यांना आता लोकसभेची बांधणी करताना नवीन कार्यकर्ते जोडावे लागणार आहेत. त्यांनीच मंजूर केलेल्या पंढरपूर-विजापूर रेल्वे प्रश्नात प्रगती नाही. ३५ गावचा पाणी प्रश्न लटकलेला आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील लाभार्थी दुष्काळ जाहीर होऊन उपायोजना नाहीत, बंद असलेली आंधळगाव व नंदुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, केंद्र शासनाच्या मनरेगाच्या कामगारांच्या गेल्या अडीच महिन्यांपासून पगार नाही, घरकुलाचे अपुरे उद्दिष्ट, स्वच्छ भारत योजनेत तालुक्यातील कुटुंबाकडे स्वच्छतागृहाचा अभाव तरीही तालुका हागणदारी मुक्त या सर्व बाबी मतदारांना पटवून देऊन त्यांच्या मतात बदल करण्याचे आवाहन सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर आहे.
इथल्या मूलभूत प्रश्नांसाठी शिंदेंना जनतेत जाऊ न देण्याचा प्रयत्न येथील स्थानिक नेत्यांनी केल्याचा आरोपही होत आहे. याचा त्यांना फटका बसला असला तरी पुन्हा लोकसभा लढवायची असेल त्यांना जनतेत जाणे गरजेचे आहे.स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवला तर त्याचे परिणाम होऊ शकतात गत चार वर्षात तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.
चार वर्षे या प्रश्नावर काँग्रेसमधील आमदार भारत भालके वगळता कोणीही आवाज उठवला नाही किंवा कॉंग्रेसला लाभ होईल असे प्रभावी आंदोलन केले नसल्याचे चित्र आहे.
जनसंघर्ष यात्रेत पोस्टरवर घुमले..
शेतकरी,कामगार,आरक्षण आदी मुद्यांवरून जनतेत सरकारी विषयी नाराजीच्या लाभासाठी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत येथील काँग्रेसमधला छुपा संघर्ष चव्हाट्यावर आला होता.भरचौकात लावलेल्या डिजिटल फलकावर एका गटाने आमदार भारत भालके यांना तर दुसऱ्या गटाने काळुंगे यांना गायब करून गटबाजीचे प्रदर्शन केले होते.या गटबाजीचा भविष्यात फटका बसू शकतो.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज