मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रत्येक गांव माझे आहे, या मतदारसंघातील प्रत्येक कुठुंबाची आर्थिक स्थिती सुधारावी हे माझे स्वप्न आहे.या मतदारसंघाचे महाराष्ट्रात आदर्श असे मॉडेल मला बनवायचे आहे त्यासाठी या मतदारसंघातील जनतेने मला साथ द्यावी असे प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले.ते फाटेवडी,तळसंगी,खोमनाळ,हिवरगाव,भाळवणी,निंबोणी,माळवाडी,पौट,सलगर,आसबेवाडी,शिवनगी,येळगी,सोड्डी,हुलजंती या गावच्या प्रचार दौऱ्यात बोलत होते.
‘आमचं ठरलंय,वारं फिरलंय’ म्हणत समाधान आवताडे यांना पाठींबा देण्याचा ओघ वाढला,
आमचं ठरलंय वारं फिरलंय’अस म्हणत मतदारसंघाच्या विकासावर भाष्य करत बेरोजगारी,पाण्याचा प्रश्नलोकप्रतिनिधींनी केलेली दिशाभूल या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मतदाररसंघाचा विकास समाधान आवताडेच करू शकतात असा विश्वास जनतेच्या मनात होत आहे त्यामुळे अनेक नेतेमंडळी गावागावातून पाठिंबा देत आहेत.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान महादेव आवताडे यांचा गावां-गावांतून प्रचार सभांमध्ये विविध मान्यवर जाहीर पाठिंबा दर्शवून आवताडे गटात प्रवेश करीत आहेत. त्यांच्या सभांना होणारी उस्फूर्त व प्रचंड गर्दी आणि वाढता पाठींबा यामुळे उमेदवार समाधान आवताडे यांचे बळ आणखी वाढलेले दिसून येते. मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजीच्या प्रचार दौ-यांमध्ये मेजर अरविंद सांगोलकर, मेजर कारंडे, आसबेवाडीचे उपसरपंच महेश खटकाळे, मा.उपसरपंच दादासो नागणे,रमेश नागणे, बालाजी भुसे, शाम आसबे, एकलासपूरचे धर्मराज ताड महाराज, मुंढेवाडी ता.पंढरपूरचे मा.सरपंच कृष्णदेव राऊत यांचेसह अनेकांनी उमेदवार समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.सामान्य जनता,सामान्य मतदार आवताडे यांना पाठिंबा देत आहेत तर काही नेतेमंडळी लक्ष्मीदर्शनासाठी इतर उमेदवारांचे उंबरठे झिजवतानाही दिसत असून या मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर मंगळवेढा तालुक्यातील मतदार एकवटताना दिसत आहे .
पुढे बोलताना ते म्हणाले, पंचवीस वर्षापासून खुंटलेला विकास येत्या पाच वर्षात करुन दाखवितो. या मातीतल्या उद्योजकांना संधी मिळाल्यास ते निश्चीतच यशस्वी होवू शकतात. एवढी कुवत आणि धमक इथल्या युवकांमध्ये आहे. परंतु आजपर्यंत त्यांना योग्य दिशा ,न्याय मिळाली नाही. प्रत्येकानी आजपर्यंत फक्त मताचा जोगवा मागण्याचेच काम केले आहे. जे वय विश्रांतीचे आहे त्या वयात उमेदवारी घेवून म्हणे जनतेची कामे करणार आहेत. पाणी आणण्याची खरंच मनापासून इच्छा असती तर पाणी यापूर्वीच पाणी आले असते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच त्यामागील कारण आहे. इतर नेत्यांप्रमाणे मी कांही आश्वासने देणार नाही. कारण आश्वासन देण्यापेक्षा करुन दाख्विण्यावर माझा विश्वास आहे. राजकारणाची उलथापालथ करुन ट्रॅक्टरने मशागत करण्याची वेळ आली आहे. वाढप्या ओळखीचा असला तर शेवटीच्या पंगतीच्या शेवटीच्या ओळीमध्ये जरी बसला तरी जेवण मिळते हे सभापती प्रदिप खांडेकर यांनी दाखवून दिले आहे.
पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी जास्तीत जास्त निधी या तालुक्याला आणला आहे. तसेच जि.प.समाजकल्याण सभापाती शिला शिवशरण यांनीही जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचे कार्य केले आहे. आपल्या मायेची थाप यापूर्वीही अनेक वेळा आपण मला दिलेली आहे, यापुढेही देवून निवडून देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.
याप्रसंगी सभापती प्रदिप खांडेकर,प्रा.येताळा भगत सर, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण,माजी उपसभापती शिवाजी पटाप, प्रा.समाधान क्षिरसागर ,हणमंत मासाळ, शिवाजी शेणवे, उत्तम केंगार,बसवंत पाटील, महादेव साखरे,गुरय्या स्वामी,ह.भ.प.धर्मराज ताड, अमर शिंदे, महेश खटकळे,नागेश मासाळ व इतर मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
या प्रचार सभा प्रसंगी दामाजी कारखान्याचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी, जि.प.सदस्य दिलीप चव्हाण, संचालक बसवेश्वर पाटील, रामकृष्ण चव्हाण,पप्पू काकेकर,विजय माने, नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी, मार्केट कमेटी संचालक विष्णू फटे, आझाद दारुवाले,तसेच अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच या प्रचार सभेमध्ये सरपंच राजेंद्र फटे,दगडू फटे,बलभिम माने,पोपट फटे,सरपंच रविकांत खांडेकर, महादेव खांडेकर, रामचंद्र होणराव, संजय बुरंगे, सरपंच आमसिध्द माळी,सुधाकर पाटील, मळसिध्द माळी,सोसायटी चेअरमन म्हाळाप्पा माने,पितांबर निमंगरे,मोहन सांगोलकर,शंकर पाटील, वसंत बिचुकले,दत्ता गायवाले, रमेश मुंगसे,दादासो कोंडूभैरी,रंगनाथ कलुबर्मे, कुमार शिंदे, उत्तम लंगडे,श्रीकांत पुकळे,रावसो बिले,संजय धायगोंडे,चनाप्पा धायगोंडे,सुनिल कदम,आनंदा आसबे,शाम आसबे,नागेश खटकाळे,बाळासो बंडगर,सतिश लालबुरे,केशव कांबळे,दादासो दबडे,बलभिम शिंदे,जगन्नाथ पाटील,चांगदेव शिंदे,अरुण पाटील,संतोष यादव,समाधान शिंदे, यांचेसह वरील गावातील सरपंच,उपसरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य, समर्थक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रत्येक गांव माझे आहे, या मतदारसंघातील प्रत्येक कुठुंबाची आर्थिक स्थिती सुधारावी हे माझे स्वप्न आहे.या मतदारसंघाचे महाराष्ट्रात आदर्श असे मॉडेल मला बनवायचे आहे त्यासाठी या मतदारसंघातील जनतेने मला साथ द्यावी असे प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले.ते फाटेवडी,तळसंगी,खोमनाळ,हिवरगाव,भाळवणी,निंबोणी,माळवाडी,पौट,सलगर,आसबेवाडी,शिवनगी,येळगी,सोड्डी,हुलजंती या गावच्या प्रचार दौऱ्यात बोलत होते.
‘आमचं ठरलंय,वारं फिरलंय’ म्हणत समाधान आवताडे यांना पाठींबा देण्याचा ओघ वाढला,
आमचं ठरलंय वारं फिरलंय’अस म्हणत मतदारसंघाच्या विकासावर भाष्य करत बेरोजगारी,पाण्याचा प्रश्नलोकप्रतिनिधींनी केलेली दिशाभूल या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मतदाररसंघाचा विकास समाधान आवताडेच करू शकतात असा विश्वास जनतेच्या मनात होत आहे त्यामुळे अनेक नेतेमंडळी गावागावातून पाठिंबा देत आहेत.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान महादेव आवताडे यांचा गावां-गावांतून प्रचार सभांमध्ये विविध मान्यवर जाहीर पाठिंबा दर्शवून आवताडे गटात प्रवेश करीत आहेत. त्यांच्या सभांना होणारी उस्फूर्त व प्रचंड गर्दी आणि वाढता पाठींबा यामुळे उमेदवार समाधान आवताडे यांचे बळ आणखी वाढलेले दिसून येते. मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजीच्या प्रचार दौ-यांमध्ये मेजर अरविंद सांगोलकर, मेजर कारंडे, आसबेवाडीचे उपसरपंच महेश खटकाळे, मा.उपसरपंच दादासो नागणे,रमेश नागणे, बालाजी भुसे, शाम आसबे, एकलासपूरचे धर्मराज ताड महाराज, मुंढेवाडी ता.पंढरपूरचे मा.सरपंच कृष्णदेव राऊत यांचेसह अनेकांनी उमेदवार समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.सामान्य जनता,सामान्य मतदार आवताडे यांना पाठिंबा देत आहेत तर काही नेतेमंडळी लक्ष्मीदर्शनासाठी इतर उमेदवारांचे उंबरठे झिजवतानाही दिसत असून या मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर मंगळवेढा तालुक्यातील मतदार एकवटताना दिसत आहे .
पुढे बोलताना ते म्हणाले, पंचवीस वर्षापासून खुंटलेला विकास येत्या पाच वर्षात करुन दाखवितो. या मातीतल्या उद्योजकांना संधी मिळाल्यास ते निश्चीतच यशस्वी होवू शकतात. एवढी कुवत आणि धमक इथल्या युवकांमध्ये आहे. परंतु आजपर्यंत त्यांना योग्य दिशा ,न्याय मिळाली नाही. प्रत्येकानी आजपर्यंत फक्त मताचा जोगवा मागण्याचेच काम केले आहे. जे वय विश्रांतीचे आहे त्या वयात उमेदवारी घेवून म्हणे जनतेची कामे करणार आहेत. पाणी आणण्याची खरंच मनापासून इच्छा असती तर पाणी यापूर्वीच पाणी आले असते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच त्यामागील कारण आहे. इतर नेत्यांप्रमाणे मी कांही आश्वासने देणार नाही. कारण आश्वासन देण्यापेक्षा करुन दाख्विण्यावर माझा विश्वास आहे. राजकारणाची उलथापालथ करुन ट्रॅक्टरने मशागत करण्याची वेळ आली आहे. वाढप्या ओळखीचा असला तर शेवटीच्या पंगतीच्या शेवटीच्या ओळीमध्ये जरी बसला तरी जेवण मिळते हे सभापती प्रदिप खांडेकर यांनी दाखवून दिले आहे.
पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी जास्तीत जास्त निधी या तालुक्याला आणला आहे. तसेच जि.प.समाजकल्याण सभापाती शिला शिवशरण यांनीही जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचे कार्य केले आहे. आपल्या मायेची थाप यापूर्वीही अनेक वेळा आपण मला दिलेली आहे, यापुढेही देवून निवडून देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.
याप्रसंगी सभापती प्रदिप खांडेकर,प्रा.येताळा भगत सर, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण,माजी उपसभापती शिवाजी पटाप, प्रा.समाधान क्षिरसागर ,हणमंत मासाळ, शिवाजी शेणवे, उत्तम केंगार,बसवंत पाटील, महादेव साखरे,गुरय्या स्वामी,ह.भ.प.धर्मराज ताड, अमर शिंदे, महेश खटकळे,नागेश मासाळ व इतर मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
या प्रचार सभा प्रसंगी दामाजी कारखान्याचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी, जि.प.सदस्य दिलीप चव्हाण, संचालक बसवेश्वर पाटील, रामकृष्ण चव्हाण,पप्पू काकेकर,विजय माने, नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी, मार्केट कमेटी संचालक विष्णू फटे, आझाद दारुवाले,तसेच अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच या प्रचार सभेमध्ये सरपंच राजेंद्र फटे,दगडू फटे,बलभिम माने,पोपट फटे,सरपंच रविकांत खांडेकर, महादेव खांडेकर, रामचंद्र होणराव, संजय बुरंगे, सरपंच आमसिध्द माळी,सुधाकर पाटील, मळसिध्द माळी,सोसायटी चेअरमन म्हाळाप्पा माने,पितांबर निमंगरे,मोहन सांगोलकर,शंकर पाटील, वसंत बिचुकले,दत्ता गायवाले, रमेश मुंगसे,दादासो कोंडूभैरी,रंगनाथ कलुबर्मे, कुमार शिंदे, उत्तम लंगडे,श्रीकांत पुकळे,रावसो बिले,संजय धायगोंडे,चनाप्पा धायगोंडे,सुनिल कदम,आनंदा आसबे,शाम आसबे,नागेश खटकाळे,बाळासो बंडगर,सतिश लालबुरे,केशव कांबळे,दादासो दबडे,बलभिम शिंदे,जगन्नाथ पाटील,चांगदेव शिंदे,अरुण पाटील,संतोष यादव,समाधान शिंदे, यांचेसह वरील गावातील सरपंच,उपसरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य, समर्थक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज