मंगळवेढा – पंढरपूर विधानसभा गावभेट दौरा;
गावातील समस्यांचा घेतला आढावा
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा – पंढरपूर तालुक्यात उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन अशा एकही क्षेत्रात ठोस विकास झाला नाही. करोडो रुपयांची तरतूद करण्यात आली. पण अद्याप विकासापासून दोन्ही तालुके वंचित आहे. त्यामुळे येत्या काळात लोकप्रतिनिधी राजकारण करणारा नको असून दूर दृष्टी ठेवून सर्वांगीण विकास करणारे नेतृत्व हवे आहे. कुटनिती पेक्षा बेरोजगारी, रस्ते, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रातील अडचणी सोडवून मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबध्द आहे. आजपर्यंत न सोडविलेले प्रश्न सोडवून सर्वांगीण विकास करण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी मतदारांनी मला संधी देण्याचा निश्चय करावा असे मत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाधान आवताडे यांनी फटेवाडी, खोमनाळ, हिवरगाव, हाजापूर, जालिहाळ, भाळवणी, तळसंगी या गावांना भेटी दिल्या. यावेळी आवताडे यांनी गावातील महिला, युवक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. विकासाचा सक्षम पर्याय म्हणून तालुक्याचे प्रश्न पोट तिडकिने सोडविण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठविणार अश्या भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.
नकारात्मक राजकारणामुळे मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील जनता आजही अनेक समस्यांशी झगडत आहे. गावांमधील मुख्य रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्याच्या समस्या, शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी, उद्योग, शेतीसाठी पाणी यामधील एकही प्रश्न अद्याप सुटला नाही. गेल्या वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरले होते. पण त्यातील एकही थेंब मिळाला नाही.शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कोणताही पाठपुरावा केला नाही. सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र जबाबदार नेते याकडे गंभीरतेने विचार करत नाही त. सक्षम नेतृत्व नसल्याने प्रश्न प्रलंबित आहेत. मला केवळ एकदा संधी द्यावी. कामे कशी करायची, प्रश्न कसे सोडवावे याचा ब्लू प्रिंट तयार आहे. सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी आणून विकास करण्याचे माझे ध्येय असल्याने मतदारांनी माझ्या पाठीशी खंबीपणे उभे राहावे, असे मत समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलताना आवताडे म्हणाले कि,
तालुक्याचे वैशिष्टय ओळखून त्यावर काम करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रश्न, गरज ओळखून कामे केल्यास विकास घडत असतो. त्यामुळे प्रत्येकाने विचार करावा. सत्तेची भाकरी पलटण्याची गरज आहे. ती न पलटल्यास करपेल. त्यामुळे ही शेवटची संधी असून मला साथ द्यावी. शेतकऱ्यांना पाणी, गावच्या पाण्याचा प्रश्न, बेरोजगारी सोडविण्यासाठी मी नक्की सोडवेन अशी ग्वाही दिली. उपस्थित गावकऱ्यांनी आपली मते व्यक्त करत विकासाचे आशास्थान केवळ समाधान आवताडे असल्याचे सांगत यंदा एकदिलाने सर्व शक्ती पणाला लावून आमदार करणार असल्याचे सांगितले.
तालुक्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आपल्यासमोर समाधान आवताडे हे एकमेव पर्याय आहेत. त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी अधिक प्रभावीपणे प्रयत्न करता येईल. त्यामुळे निःपक्षपाती कामे करावयाची असल्यास आवताडे यांना एकदिलाने सहकार्य करण्याचे मनोगत शिवसेना नेते येताळा भगत यांनी व्यक्त केले. तर तालुक्याचे सक्षम युवा नेतृत्व म्हणून समाधान आवताडे यांना सर्वजण पाठिंबा देणार असे मनोगत संचालक सचिन शिवशरण यांनी व्यक्त केले.
या संवाद दौऱ्यात शिवसेना नेते येताळा भगत, पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, दामाजी साखर कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण,बसवेश्वर पाटील, विजय माने,भारत निकम, पप्पू काकेकर, सरपंच राजेंद्र फटे, विष्णुपंत फटे,बलभीम माने, शामराव फटे, सुनील फटे, दादासो मेटकरी, आनंद खावेकर, विशाल घुले, सोमनाथ टोमके, संभाजी चव्हाण, सर्जेराव गणपाटील, दगडू फटे, मनोहर फटे, दिगंबर शिंदे राजेंद्र फटे, राजेंद्र फटे, चंद्रकांत लेंडवे, मंगेश फटे, सुरेश चव्हाण, नवनाथ चव्हाण, सागर कौडुभैरी, संजय कटे,पोपट फटे, सरपंच रविकांत खांडेकर, रामचंद्र होनराव, बंडू वाघमोडे, अशोक बुरंगे, रघुनाथ खरवडे, राजू लोकरे, समाधान नागणे, अनिल शेंडगे, अरुण पाटील, महादेव खांडेकर, सहदेव, खांडेकर, तानाजी ढोमे, रामचंद्र खांडेकर, तानाजी कुपाडे, गणेश देशमुख, ज्ञानदेव मोठे, अविनाश लावते, नामदेव लोकरे, युवराज खरबडे, युवराज खांडेकर, संग्राम गायकवाड, सरपंच उत्तम लंगडे, श्रीकांत पुकळे, रंगनाथ कालुबर्मे, प्रमोद इंगळे, बाबासो बिले, दिलीप हजारे, बाबासो इंगळे, विठ्ठल इंगळे, रवीकुमार शिंदे, अजित पवार, डॉक्टर कदम, औदुंबर मोरे, दादासो इंगळे, शिरीष सरवदे, शिवाजी लंगडे, सिद्धेश्वर जाधव, रामचंद्र जाधव, लिंबाजी खांडेकर, रामचंद्र इंगळे, सचिन शिंदे, मोहन नागाने, रोहित इंगळे, नीलकंठ देशमुख, आण्णासो वाकडे, पोपट आवताडे, दयानंद काळे, शिवाजी फटे, श्रीकांत गावंड, राजेंद्र देवकुळे, तानाजी देवकाते, कुंडलिक बिचुकले, अरुण वाघमोडे, शिवाजी याजगार, मारुती बिचुकले, विश्वंभर कारचे, खंडू बहिस्ते, शिंदे भाऊसाहेब, शाम आकुळे, माजी सरपंच महादेव खांडेकर, सचिन चौगुले, रायगोंडा पाटील, दामू मोटे, शिवाजी लोखंडे, रामभाऊ शेंबडे, अशोक चौंडे, लक्ष्मण बरफडे, लक्षण सोनलकर, बाबसो इंगळे, दत्ता साबणे, चौगुले सर, बलभीम शिंदे, अंशुमन शिंदे, अशोक नागणे, धनाजी पाटील, सुभाष साखरे, महादेव साखरे, चारुदत्त पाटील, चंद्रकांत मोरे, रामहरी जाधव, हुकुम मुलाणी, अण्णा शिंदे, नामदेव चव्हाण, शिवाजी शेणवे, रामभाऊ सरवदे, चंद्रकांत पाटील, दादासो दोडके, रमेश मुंगसे, दत्ता गायवाले, रकमाजी दुधाळ, विजय कावनाळे, बंडू शेणवे यांच्यासह गावातील सरपंच, उपसरपंच, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व मोठ्या प्रमाणत ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज