मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या बी.टेक च्या शेवटच्या वर्षात शिकत असलेला व मूळ अकोला (ता.मंगळवेढा) येथील रहिवाशी असलेला धर्मराज दत्तात्रय इंगळे (वय २१) याने आपला कॉलेजमध्ये अपमान झाला आहे,असे सांगत कुटुंबियाचे लक्ष चुकवून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
ही घटना दि.२५ रोजी पहाटे घडली आहे.या घटनेमागचे नेमके कारण शोधण्याची मागणी इंगळे कुटुंबाकडून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , धर्मराज हा गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूर येथील डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असून सध्या होते तो बी.टेक च्या शेवटच्या वर्षात शिकत होता.परंतु शुक्रवारी धर्मराजच्या मित्रांचा त्याच्या आई – वडिलांना फोन आला की तुमच्या मुलाचा कॉलेजमध्ये अपमान झाला आहे. त्यामुळे तो आत्महत्या करणार आहे असे म्हणत आहे, तसेच त्यामुळे त्याला एस.टी त बसवून गावाकडे पाठवून दिले आहे.
परंतु ती सायंकाळी ६ वाजता घरी आल्यानंतर देखील व घरी सर्वांसमोर देखील तो मी आत्महत्या करणार असल्याचे हे सांगत असल्याने त्याचे कुटुंब त्याच्यावर लक्ष ठेऊन होते .परंतु त्याने घरच्यांचे लक्ष चुकवून शनिवारी पहाटे बागेत फवारण्यासाठी आणलेले विषारी तणनाशक प्राशन केले.
त्यास उपचारासाठी सोलापूर येथे नेण्यात आले , परंतु मंगळवेढा येथून सोलापूरकडे उपचारासाठी नेत असताना त्याचे निधन झाले.
या घटनेची मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे . त्याच्या पश्यात आई , वडील , एक भाऊ असा परिवार असून तो कॉलेजमध्ये हुशार विद्यार्थी होता . परंतु गावाकडे येण्यापूर्वी दोन दिवस एकलकोंडी व कोणत्यातरी मानसिक तणावाखाली होता व माझा कॉलेजमध्ये अपमान झाला असून मी आत्महत्या करणार असे मित्रांना व आई – वडिलांना म्हणत होता . तसेच तो सगळ्यांना सॉरी म्हणून माफी देखील मागत होता . त्यामुळे या आत्महत्येमागील नेमके कारण शोधून काढण्याची मागणी धर्मराजच्या कुटुंबाकडून होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज