मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ज्यांनी उभा केले त्यांना फसवले,ज्यांनी सत्तेत बसवले त्यांना फसवले,जर वेळी निवडून देणाऱ्या जनतेला फसवले अशांना भाजपाने हाबडा दिला असल्याची माहिती आ.प्रशांत परिचारक यांनी सांगितली.पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आहे.
आ.परिचारक पुढे बोलताना म्हणाले की,२००९ ला राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुधाकरपंत परिचारक यांना दिलेला शब्द पाळला नाही.त्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आलीय.हवा बदलली आहे . हि निवडणूक एकतर्फी आहे. समोरचा उमेदवार उसनं अवसान आणून लढतोय.
पांडुरंग कारखाना वगळता सर्व कारखाने तोट्यात आहेत.आज अर्बन बँक ३५ कोटी रुपये नफ्यात आहे. आणि बॅलन्सशीट मध्ये दोन कोटी रुपये नफा असलेला पांडुरंग कारखाना एकमेव आहे.एफआरपी दिली आहे ,कामगारांचे पगार कधी थकून दिले नाहीत. कारखान्याच्या ठेकेदाराचे सर्व देणी दिली आहेत.आपला कारभार निस्पृह आहे म्हणूनच आपल्या शब्दला सरकार दरबारी वजन आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी गटतट हेवेदावे बाजूला सारून विजयासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आ . प्रशांत परिचारक यांनी केलं.
आपल्या देशाला पहिल्यांदाच एक कणखर पंतप्रधान भेटला आहे.जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला देखील हाताला धरून बसवतो. आज केंद्र आणि राज्य सरकार अनेक धाडसी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे.
मंगळवेढा व पंढरपूर तालुकयातील विकास योजनासाठी आम्ही सरकारकडून कोट्यवधी रुपये निधी मंजूर करून आणला , आपल्याला अजूनही अनेक कामे मार्गी लावायची आहेत त्यासाठीच आपण एकजुटीने महायुती सरकारच्या विजयासाठी पर्यंत करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ज्यांनी उभा केले त्यांना फसवले,ज्यांनी सत्तेत बसवले त्यांना फसवले,जर वेळी निवडून देणाऱ्या जनतेला फसवले अशांना भाजपाने हाबडा दिला असल्याची माहिती आ.प्रशांत परिचारक यांनी सांगितली.पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आहे.
आ.परिचारक पुढे बोलताना म्हणाले की,२००९ ला राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुधाकरपंत परिचारक यांना दिलेला शब्द पाळला नाही.त्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आलीय.हवा बदलली आहे . हि निवडणूक एकतर्फी आहे. समोरचा उमेदवार उसनं अवसान आणून लढतोय.
पांडुरंग कारखाना वगळता सर्व कारखाने तोट्यात आहेत.आज अर्बन बँक ३५ कोटी रुपये नफ्यात आहे. आणि बॅलन्सशीट मध्ये दोन कोटी रुपये नफा असलेला पांडुरंग कारखाना एकमेव आहे.एफआरपी दिली आहे ,कामगारांचे पगार कधी थकून दिले नाहीत. कारखान्याच्या ठेकेदाराचे सर्व देणी दिली आहेत.आपला कारभार निस्पृह आहे म्हणूनच आपल्या शब्दला सरकार दरबारी वजन आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी गटतट हेवेदावे बाजूला सारून विजयासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आ . प्रशांत परिचारक यांनी केलं.
आपल्या देशाला पहिल्यांदाच एक कणखर पंतप्रधान भेटला आहे.जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला देखील हाताला धरून बसवतो. आज केंद्र आणि राज्य सरकार अनेक धाडसी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे.
मंगळवेढा व पंढरपूर तालुकयातील विकास योजनासाठी आम्ही सरकारकडून कोट्यवधी रुपये निधी मंजूर करून आणला , आपल्याला अजूनही अनेक कामे मार्गी लावायची आहेत त्यासाठीच आपण एकजुटीने महायुती सरकारच्या विजयासाठी पर्यंत करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज