मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
गेली विस ते पंचवीस वर्षापासून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा विकास पूर्णपणे खुंटलेला आहे. हा विकासाचा बùकलाùग मी पाच वर्षात भरुन काढणेस कटिबध्द् आहे। मला या मतदारसंघाचे नंदनवन करायचे आहे। असे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले.
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने रांझणी, मुंढेवाडी, अनवली,एकलासपूर,शिरगांव,तरटगांव,सिध्देवाडी, चिचुंबे, तावशी, तनाळी, त।शेटफळ, कासेगांव आदि गावांमध्ये प्रचारसभा पार पडल्या। याप्रसंगी अपक्ष उमेदवार समाधान आवताडे बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, आजपर्यंत या मतदारसंघात फक्त आश्वासनाचाच पाऊस पडलेला आहे। भावनीक गोष्टीही यापुढे बोलल्या जातील। तरुण वर्गाला माझी विनंती आहे, अशा गोष्टींना बळी पडू नका। तुमची झालेली प्रगती ही तुमच्या कष्टामुळे झालेली आहे, कुणाच्या प्रयत्नाने झालेली नाही। शासनाच्या अनेक योजणा असतात पण त्या राबविण्याची धमक लागते। आमदार फंड आणला म्हणजे विकास झाला का। फंड हा आमदारांना येतच असतो, यात वेगळे असे कांही नाही। एकमेकांवर सोशल मिडीयावर उमेदवारांची टिका-टिपण्णी ,उणी-धुणी काढण्याचे काम चालले आहे। यापेक्षा तुम्ही जर विकास केला असेलच तर त्या विकासाची पावती जनतेला द्या। वयाच्या मानाने मतदारसंघ पिंजून जनतेच्या समस्या ते कसे सोडविणार आहेत हाही प्रश्न आहे। कोणतीही सत्ता नसताना मी तरुणांसाठी नोकरीच्या संधी निर्माण केलेल्या आहेत। तळागाळातील समस्यांची मला जाण आहे, यासाठीच संधी द्या । त्या संधीचे निश्चीतच सोने करेन असे शेवटी उमेदवार समाधान आवताडे म्हणाले।
या प्रचार सभांना सर्वत्र उदंड असा प्रतिसाद मिळाला। तसेच प्रत्येक गावामध्ये उमेदवार समाधान आवताडे यांचे गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक शेखरभाऊ भोसले , दत्तात्रय जमदाडे, मुन्ना मलपे, डाù।वृषाली पाटील, मुकेश वाडेकर, समाधान चौगुले, दिलीप भोसले, औदुंबर शिंदे वस्ताद यांनीही या परिवर्तनाच्या लढाईमध्ये उमेदवार समाधान आवताडे यांना साथ द्या असे आवाहन केले। या प्रचार दौ-यामध्ये पंचायत समिती सभापती प्रदिप खांडेकर,पांडूरंग कारखान्याचे माजी संचालक भालचंद्र मोरे, चंद्रभागा सह कारखान्याचे मा. संचालक सुभाष भाऊ यादव, संतोष मोरे, ज्ञानेश्वर मोरे, भारत मोरे, दामाजी कारखान्याचे संचालक राजीव बाबर, सचिन शिवशरण,लक्ष्मण मस्के, सतिश मोहिते, गणेश गांवकरे, खंडू खंदारे, शाम पवार, सतिश पाटील,गोपाळ पवार, विठ्ठल लवटे,नवनाथ कांबळे,शहाजी पाटील, कल्याण जाधव, दगडू भुसे, संभाजी भुसे, मोहन बागल, खानसाहेब मुलाणी, शांतीनाथ बागल, समाधान क्षरिसागर, सुधाकर फटे, ड्रॉ साबळे, गंगाराम मासाळ, कृष्णदेव मासाळ, गणेश कांबळे, बाळासाहेब खांडेकर , बजरंग जाधव,तुकाराम कुरे, मुबारक आतार, पांडूरंग करकंबकर, योगेश वाडेकर, ज्ञानेश्वर घाडगे, महादेव घाडगे, मुकेश वाडेकर, सुभाष बारले, अनिल डिसले, दत्ता भोसले, संजय माळी,बंडू पाटील, लाला डोंगरे, भास्कर सुरवसे यांचेसह वरील गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्तावीक दिगंबर यादव यांनी केले तर सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले।
प्रचार सभेमध्ये अनेक मातब्बरांनी उमेदवार समाधान आवताडे यांना पाठींबा जाहीर करुन समाधान आवताडे गटात प्रवेश केला। यामध्ये रांझणी येथे रामेश्वर डोंगरे, सुखदेव घोडके, मुंढेवाडी येथे साहेबलाल शेख, शेखलाल शेख, सय्यद शेख, पैगंबर शेख, नवनाथ राऊत, एकलासपूर येथे धनाजी पांढरे, तानाजी पांढरे ,बंडूनाना ताड, अप्पासाहेब रणदिवे यांनी जाहीर पाठींबा दिला। याप्रसंगी उमेदवार समाधान आवताडे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज