मंगळवेढा : समाधान फुगारे
काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी सत्ताधारी पक्षात न जाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात काही प्रमाणात बॅकफूटवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू आणखी भक्कम झाली असल्याचे मानले जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून आमदार भारत भालके हे काँग्रेसला सोडचिट्टी देवून भाजपमध्ये प्रवेश करणार अशा वावड्या सुरु होत्या. परंतु रविवारी अखेर काँग्रेसची साथ सोडून आमदार भालकेंनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हातात घड्याळ बांधले. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापू्र्वीच आमदार भालकेंनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
आमदार भारत भालकेंनी 2004 साली पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणुक माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात लढवली होती. त्यावेळी भालके पराभूत झाले होते. त्यानंतर 2009 साली दुसऱ्यांदा रिडालोसकडून राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांनी मोहिते पाटलांचा दारुन पराभव केला होता.
2014 च्या निवडणुकीत विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात आमदार भालकेंनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून परिचारकांचा सुमारे आठ हजार मतांनी पराभव केला होता. आमदार भालके भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असताना त्यांनी अचानक राष्ट्रवादीकडून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता पर्यंतच्या तिन्ही विधानसभा निवडणुकीत आमदार भालकेंनी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुक लढवली आहे.या निवडणुकीत त्यांना थेट माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात लढावे लागणार आहे.
सुधाकर परिचारक हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. तर आमदार भालकेंची देखील राजकारणात कसलेला पैलवान म्हणून ओळख आहे. विधानसभेच्या आखाड्यात कोण कशी मात करुन निवडणुकीचा फंड जिंकतो याकडेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार भारत भालके यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याचा निर्णय त्यांनी जनतेवर सोपवला होता. मात्र जनता हाच माझा पक्ष म्हणत हा निर्णय त्यांनी स्वतःकडे घेतला होता. भालके हे नेमके कोणात्या पक्षात प्रवेश करणार, या विषयी तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भालकेंच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची बाजू आणखी बळकट झाली असल्याचे मानले जात आहे.
आमदार भालकेंच्या राजकारणाला आता, राष्ट्रवादीची जोड मिळाल्याने तूर्तासतरी भालकेंचाच बोलबाला राहणार असून, येत्या काळात मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघातील हा संघर्ष कमालीच्या चुरशीचा राहताना, लोकांमध्ये याबाबत कुतूहल, उत्सुकता, उत्कंठता राहील हे निश्चित.
मंगळवेढा : समाधान फुगारे
काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी सत्ताधारी पक्षात न जाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात काही प्रमाणात बॅकफूटवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू आणखी भक्कम झाली असल्याचे मानले जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून आमदार भारत भालके हे काँग्रेसला सोडचिट्टी देवून भाजपमध्ये प्रवेश करणार अशा वावड्या सुरु होत्या. परंतु रविवारी अखेर काँग्रेसची साथ सोडून आमदार भालकेंनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हातात घड्याळ बांधले. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापू्र्वीच आमदार भालकेंनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
आमदार भारत भालकेंनी 2004 साली पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणुक माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात लढवली होती. त्यावेळी भालके पराभूत झाले होते. त्यानंतर 2009 साली दुसऱ्यांदा रिडालोसकडून राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांनी मोहिते पाटलांचा दारुन पराभव केला होता.
2014 च्या निवडणुकीत विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात आमदार भालकेंनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून परिचारकांचा सुमारे आठ हजार मतांनी पराभव केला होता. आमदार भालके भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असताना त्यांनी अचानक राष्ट्रवादीकडून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता पर्यंतच्या तिन्ही विधानसभा निवडणुकीत आमदार भालकेंनी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुक लढवली आहे.या निवडणुकीत त्यांना थेट माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात लढावे लागणार आहे.
सुधाकर परिचारक हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. तर आमदार भालकेंची देखील राजकारणात कसलेला पैलवान म्हणून ओळख आहे. विधानसभेच्या आखाड्यात कोण कशी मात करुन निवडणुकीचा फंड जिंकतो याकडेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार भारत भालके यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याचा निर्णय त्यांनी जनतेवर सोपवला होता. मात्र जनता हाच माझा पक्ष म्हणत हा निर्णय त्यांनी स्वतःकडे घेतला होता. भालके हे नेमके कोणात्या पक्षात प्रवेश करणार, या विषयी तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भालकेंच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची बाजू आणखी बळकट झाली असल्याचे मानले जात आहे.
आमदार भालकेंच्या राजकारणाला आता, राष्ट्रवादीची जोड मिळाल्याने तूर्तासतरी भालकेंचाच बोलबाला राहणार असून, येत्या काळात मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघातील हा संघर्ष कमालीच्या चुरशीचा राहताना, लोकांमध्ये याबाबत कुतूहल, उत्सुकता, उत्कंठता राहील हे निश्चित.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज