टीम मंगळवेढा टाईम्स ।
मोठया प्रमाणात असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना सुरू केली आहे. यामध्ये सहा हफ्त्यात थकबाकी भरून दंड व व्याज यामध्ये माफी मिळणार आहे.
सोलापूर मंडळातील पात्र असलेल्या १ लाख ४६ हजार ३४१ ग्राहकांकडे ९ ० कोटी रुपयांची थकबाकी तर १३ कोटी ८ लाख रुपयांचे दंड आणि व्याजापोटी थकलेले आहेत.
या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांना पुनर्जोडण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेचा कालावधी दि.१ मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे. ग्राहकांना मूळ थकबाकीची रक्कम भरावी लागेल . त्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येईल.
थकबाकीदार ग्राहकांनी मुळ थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के व लघुदाब ग्राहकांना १० टक्के थकीत मूळ रकमेत अधिकची सवलत मिळेल.
ग्राहकांना सुलभ हफ्त्याने थकीत रक्कम भरावयाची असल्यास मूळ थकबाकीच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरणे आवश्यक आहे. सर्व पात्र वीजग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी केले आहे.
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज