टीम मंगळवेढा टाईम्स।
पोटी तीनही मुलीच जन्मल्या. त्याशिवाय शेतीचे कर्ज. या तणावातून तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवले.
मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथे ही घटना घडली. समाधान उद्धव मेटकरी (वय ३२) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. उद्धव भगवान मेटकरी यांनी पोलिसात खबर दिली.
बालाजीला जातो, असे म्हणून समाधान पंधरा दिवसांपूर्वी घरातून निघून गेला होता. शनिवारी सायंकाळी ८ वाजता शेतातील वस्तीवर सर्व कुटुंब झोपी गेले.
उद्धव मेटकरी रविवारी सकाळी ६ वाजता नदीची मोटार चालू करून शेताला पाणी देण्यासाठी गेले होते. ८:३० च्या सुमारास बांधावरील झाडाला समाधानने गळफास घेतल्याचे दिसून आले.
तीनही अपत्ये मुली आणि कर्जाच्या तणावातूनच त्याने गळफास घेतल्याचे वडिलांनी दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे. तपास पोलिस हवालदार महेश कोळी करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज