मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
माघी वारीनिमित्त पंढरपूर वाखरी येथे जनावरांचा मोठा बाजार भरत असतो. मागील वर्षी दुष्काळामुळे बाजार कमी भरला होता. परंतु, यंदाच्यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिला असला तरी अवकाळी नुकसानामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा माघ वरीत २ हजारांहून अधिक शेकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीसाठी आणली. या बाजारात जवळपास ६० लाखांची उलाढाल झाली आहे.
बाजारात कर्नाटक, पुणे, नाशिक व कोल्हापुर, सोलापूर या भागांतून जनावरे खरेदी-विक्रीसाठी ग्राहक दाखल झाले होते. यामध्ये खिलार बैल, खोंड, म्हशी अशी जनावरे शेकऱ्यांनी विक्रीला आणली होती. शेतीतील अत्याधुनिक यांत्रिकीकरण साधनामुळे बाजारामध्ये जनावरांच्या खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत नसल्याचे मत शेकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
यावेळी खिलार जनावरांची संख्या कमी होत असल्याने तसेच शेकऱ्यांनी त्यासंबधी आधिक माहिती मिळावी यासाठी यासाठी पंढरपूर बाजार समिती यांचेकडून प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. तसेच नगरपरिषद व ग्रामपंचायत वाखरीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. यावेळी जवळपास ६० लाखांची उलाढाल झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विविध सुविधा दिल्या जात असून भविष्यात अधिक चांगल्या सुविधा देण्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा मानस आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज