मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सा.मंगळवेढा वेध च्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा व गुणवंताचा सत्कार सोहळा गुरूवार दि. 13 फेब्रवारी रोजी सकाळी 11 वाजता श्रीराम मंगल कार्यालयात मंगळवेढा येथे आयोजित केल्याची माहिती संपादक शिवाजी केंगार यांनी दिली.
या पुरस्कार वितरण सोहळयास सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, आ.रामहरी रूपनर,विठ्ठलचे संचालक भगीरथ भालके,जि.प.चे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,सभापती प्रेरणा सुधाकर मासाळ उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अध्यक्षस्थानी होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर तर प्रमुख उपस्थिती दामाजीचे माजी चेअरमन शिवाजीराव काळुंगे, अॅड.नंदकुमार पवार,डॉ.प्रा.बी.पी.रोंगे, राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील, ओ.बी.सी सेलेचे जिल्हाध्यक्ष लतिफभाई तांबोळी, दामाजीचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी, मार्केट कमिटीचे चेअरमन सोमनाथ आवताडे,पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, दै.दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे, जेष्ठ पत्रकार शिवाजी पुजारी, दै.पंतनगरी न्यूजचे संपादक रजाकभाई मुजावर युटोपीयनचे एम.डी श्री उत्तमराव पाटील,राष्ट्रीय नेते एकनाथ जावीर, प्रदेश अध्यक्ष नंदकुमार केंगार, जिल्हाअध्यक्ष पांडूरंग गेजगे, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवेढा वेध च्या वर्धापन दिनानिमित्त होलार समाज प्रतिष्ठान मंगळवेढा व भटक्या विमुक्त जाती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गुणीजनांचा सत्कार व सन्मान होणार असून वेध पुरस्कार 2020 चे पुरस्कार पुढीलप्रमाणे श्री.मच्छिंद्र भोसले- जिवनगौरव पुरस्कार, श्री.रामचंद्र मळगे – आदर्श मा.सरपंच पुरस्कार, श्री. हैदर केंगार – समाजभूषण पुरस्कार, श्री. महादेव बिराजदार- सहकाररत्न पुरस्कार, श्री. ज्ञानेश्वर भगरे – आदर्श पत्रकार पुरस्कार, श्री. चंद्रकांत पवार – आदर्श आरोग्य मित्र पुरस्कार, श्री. ब्रम्हानंद कदम – आर्दश पशुमित्र पुरस्कार, श्री. श्रीकांत पवार – आदर्श प्रशिक्षणार्थी, आदर्श महिला बचत गट ग्रामसंघ मरवडे यांना जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण येत्या गुरूवारी मंगळवेढा येथे होणार आहे.
वेगवेगळया क्षेत्रात अनेक मंडळी उल्लेखनिय व समाजहिताचे कार्य करीत आहेत. मात्र त्यांच्या कार्याची दखल आजही कोणी घेतली नाही, खर्या अर्थाने समाजकार्यातून थेट जनतेशी नाळ जोडलेल्या तळागाळातील लोकाभिमुख गुणीजनांचा सन्मान व्हावा, यासाठी वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुरस्कार रूपाने सन्मान ठेवल्याचे मत शिवाजी केंगार यांनी बोलताना व्यक्त केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज