मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी व शहरातील गुरूकूल विद्यालयात इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन शाळकरी मुलांचा सोमवारी (ता. १७) दुपारी बाराच्या दरम्यान बाळापूर येथील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरील घटनेमुळे पालकवर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.
धर्माबाद तालुक्यातील नायगाव येथील लखन सिधप्पा राचेवाड (वय १४) आणि साईचरण किशनराव आलूरोड (वय १४) हे दोघेजण येथील गुरूकूल विद्यालयात इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेत होते. तसेच शाळेच्याच वसतीगृहात राहत होते.
पोलिसांनी शोध लावून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले
सदरील घटनेची माहिती परीसरातील लोकांना कळताच लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविली आहे. लगेच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, बाळापूर बीटचे जमादार व्ही. एस. स्वामी यांनी दाखल झाले. पाण्यात बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी बीट जमादार स्वामी, नायगावचे माजी सरपंच मारोती पोतन्ना तोकलवाड, कानोजी कोंडिबा फुलवाड रा. नायगाव, शाम मारोती पांचाळ रा. रत्नाळी, सय्यद निजाम अतकुर (ता. धर्माबाद)
यांनी पाण्यात उतरून शोध मोहीम सुरू केली.
शिक्षक व संचालकावर कार्यवाही करण्याची मागणी
मयत लखन किशनराव आलूरोड याचा मृतदेह सापडला. बऱ्याच वेळानंतर साईचरण किशनराव आलूरोड याचाही मृतदेह पाण्यात सापडला आहे. लखन सिधप्पा राचेवाड याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. परंतु साईचरण किशनराव आलूरोड याचा मृतदेहास नातेवाईकांनी उचलू दिले नाही. घटना घडून चार घंटे झाले तरी शाळेतील एकही शिक्षक व शाळेचा संचालकवर्ग घटनास्थळी आले नसल्यामुळे वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले. यावेळी शाळेतील शिक्षक व संचालकावर कार्यवाही करण्याची मागणी धरून नातेवाईक जागेवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज