मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने पाच दिवसाचा आठवडा जाहीर केल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या सुट्यात भरमसाट वाढ झाली असून, २०२० मध्ये आता उरलेल्या ३०७ दिवसामध्ये १०२ सुट्या मिळणार असल्याने त्यांची चांगलीच चंगळ होणार आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर झालेल्या निर्णयानुसार अतिरिक्त शनिवारच्या एकूण ४४ सुट्या त्यांना अधिक मिळत आहेत. त्यात या कर्मचाऱ्यांना सलग सुट्या घेण्याची संधी आता उर्वरीत सात महिन्यात ११ वेळा मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयात बहुतांश वेळा कर्मचाऱ्यांच्या जागा वर्षभरात शेकड्याहून अधिक दिवस रिक्त दिसणार आहेत.
सरकारने घेतलेल्या निर्णयात या कर्मचाऱ्यांना ४५ मिनीटांचे अतिरिक्त काम दिले असले तरी या वर्षातील उरलेल्या कार्यालयीन कामकाजाच्या २०५ दिवसात ते केवळ नऊ हजार २२५ मिनीटे अधिक होते. मात्र ते वाढलेल्या सुट्यांच्या तुलनेत अतिशय नगण्य आहे.
सलग सुट्याचे चित्र सरकारी कार्यालयात मार्च, एप्रिल, मे, आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दिसणार आहे. या महिन्यात कर्मचारी शनिवारला लागून सुट्या आल्याने सलग तीन अथवा चार दिवस कार्यालयात दिसणार नाहीत. सात आणि आठ मार्चच्या शनिवार-रविवारच्या सुट्यांना लागून नऊ तारखेची रजा टाकली की १० मार्चला धुलीवंदनाची सुटी आहे. त्यामुळे त्यांना सलग चार दिवस सुटी घेता येणार आहे. काही कर्मचारी गुढी पाडवा साजरा करण्यासाठी २१, २२ मार्चला जोडून २३, २४ची रजा टाकून गुढी पाडव्यापर्यंत सुटीवर राहतील.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज