मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर-बार्शी मार्गावरील शेळगावजवळ शुक्रवारी (दि. 21) क्रूझर जीप व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातातील मृतांची संख्या आता सातवर पोहोचली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्षा रामचंद्र आखाडे (वय 36, रा. कुमठा नाका, सोलापूर) व शुभांगी प्रकाश बोंडवे (वय 32, रा. बार्शी) यांचा रविवारी सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जीवन उन्नती अभियान (उमेद) अंतर्गत होत असलेल्या सोलापूर येथील रुक्मिणी जत्रेसाठी बार्शी पंचायत समितीचे दहा कर्मचारी क्रूझर जीप (क्र. एम एच 13, सी.एस. 6231) मधून सोलापूरला निघाले होते. त्यांची गाडी शेळगावजवळ आली असता समोरून येणार्या सोलापूर-बार्शी एसटी (एम.एच. 14, बी. टी.3775)ने जीपला धडक दिली. या भीषण अपघातात दोन कर्मचारी व जीपचालक जागीच ठार झाले होते. तर दोन कर्मचार्यांचा सोलापुरातील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचदिवशी मृत्यू झाला होता.
दरम्यान, रविवारी (दि. 23) वर्षा आखाडे यांचा गंगामाई रुग्णालयात, तर शुभांगी बोंडवे यांचा सीएनएस रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. खराब रस्ता, त्यावरील खड्डे यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांच्या संगनमताने करण्यात येणारे निकृष्ट दर्जाचे रस्ते आणखी किती जणांचे बळी घेणार, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज