मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । केक आणण्यासाठी गेलेला शाळकरी मुलगा घरी परतलाच नाही . तेव्हा माझ्या मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे . रमेश ऊर्फ रामू म्हान्तंय्या स्वामी ( वय १४ ) राहणार – खैरादी नगर , प्लाट नंबर – ८ मल्लिकार्जुन नगर जवळ , अक्कलकोट रोड , सोलापूर असे पळवून नेलेल्या मुलाचे नावे.
रमेश स्वामी हा शाळेवरून घरी आला . त्यादिवशी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता आई पार्वतीने केक आणण्यासाठी ५०० रुपये दिले होते . प्रथम उशीर झाला तरी तो राहते घर ते मल्लिकार्जुन नगर , बेकरी हून तो घरी परत आला नाही . तो कोणत्यातरी पाहुण्यांकडे गेला असावा असे वाटल्याने आई व वडील , काकू काकांनी त्या रात्री त्यांच्या नातेवाईकांकडे फोनवरून तपास केला तो सापडला नाही.
रमेश स्वामी सोलापुरातील अक्कलकोट रोड वरील एस व्ही सी एस हायस्कूल येथे नववी मध्ये शिकत होता . रमेश स्वामी याचा उंची – ४ . ५ इंच , रंग – सावळा , नाक – सरळ , चेहरा – गोल , कपडे अंगात चॉकलेटी शर्ट , व पांढरी पँन्ट , भाषा – मराठी , हिंदी व कन्नड येते . वडील ट्रक ड्रायव्हर आहेत . त्यांनी पुण्याकडे तपास केला पण तो मिळाला नाही . यामुळे आई पार्वती स्वामी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलगा रमेश यास अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद दिली आहे . पुढील तपास एस आय सचिन माळी हे करत आहेत . तरी कोणास तो मुलगा आढळून आल्यास ९८३४६४१ १९८ , ९६५७२५३४९३ , ९८६०३ ९६७०२ख ८८०६११२३६९ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा . संबधितांना योग्य बक्षीस देण्यात येईल . असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज