मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मस्जिदचा रस्ता वापरण्याच्या कारणावरून एकाच समाजाच्या दोन कुटुंबामध्ये वाद निर्माण होवून वादाचे पर्यावरसन हाणामारीत झाले. यावेळी तलवारीने वार करून तिघांना जखमी केल्याची घटना येथील एकतानगरात घडली.
नाजीया परवीन मो. फिरोज (वय 28) रा. एकतानगर या विवाहितेने शहर पोस्टेला तक्रार दिली की, 14 मार्च रोजी ती पती आणि मुलींसह घरामध्ये हजर असताना शेजारी राहणारे आबीद अली गुलाम अली त्यांची मुले आजम अली व अशरफ अली आणि मुलगी शहजादी सहेर हे चौघे घरासमोर आले व मस्जिदचा रस्ता वापरण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून विवाहिता आणि पतीला मारहाण केली. याबाबत शहर पोस्टेला तक्रार देण्यासाठी गेले असता समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी समजूत घालून प्रकरण मिटविले.
नंतर भांडणाची माहिती विवाहितेचा अकोला येथे राहणारा भाऊ मो. शोएब रा. जिरा बावडी याला मिळाली असता तो त्याच्या तीन मित्रांसह अकोला येथून तिच्या घरी आला. यावेळी उपरोक्त चौघांनी विवाहितेच्या भावाला आणि त्याच्या मित्रांना पाहून पुन्हा वाद निर्माण केला आणि आजम अली याने तिच्या भावाला तलवारीने खांद्यावर वार करून जखमी केले. तसेच इतरांनी विवाहिता आणि तिच्या पतीला लोखंडी पाईप व गजाने मारहाण करून जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज