मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । यंदा महाराष्ट्रातील तमाम जनता ही ऐक्याची, निरोगी आरोग्याची गुढी उभारुन कोरोना मुक्तीचा संकल्प घेऊन नववर्षाचं स्वागत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रातील लोकांना उत्तम आरोग्य लाभो, असं म्हणत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘महाराष्ट्रातील लोक आज गुढीपाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो. या वर्षी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.’, असं ट्विट मोदींनी केलं आहे.
‘गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी’, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील केलं आहे. ‘नागरिकांनी यंदा कोरोनाविरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची, कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी’, असं ते म्हणाले. तर ‘गुढी पाडव्याचा सण आपण आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करावा. घरी रहा आणि सुरक्षित रहा !’, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील केलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा हा वाढतच चालला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच लॉकडाऊनची घोषणा केली होती. सध्या महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा हा १०७ वर पोहोचला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज